शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या ‘नदी जोड’कडे दुर्लक्ष झाल्यानेच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:38 IST

सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नोंदविले.

ठळक मुद्देरामदास आठवले : दुष्काळी गावात भेट, शहिदाच्या कुटुंबाला पाच लाख

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नोंदविले.शुक्रवारी दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आठवले जिल्ह्यात आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जाम गावात पाहणी केली. तेथे वीजबिल थकित असल्याने गावाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. लोकांनी ही व्यथा आपल्यापुढे मांडली. अशीच स्थिती अनेक गावात आहे. आता या दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देताना, अशा गावांचे वीजबिल माफ करण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ हटविण्यासाठी केंद्रातून निधी मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण कायमस्वरुपी उपाय बाबासाहेबांच्या नदी जोड कार्यक्रमातूनच होणार आहे. मुंबई, कोकण या भागात अधिक पाऊस पडतो. तेथील नद्यांचे पाणी अडवून कमी पाऊस पडणाºया विदर्भ-मराठवाड्यातील नद्यांमध्ये सोडले जावे. विदर्भातही आणखी मोठे डॅम बांधण्याची गरज आहे.दरम्यान, दुष्काळी गावांची पाहणी करतानाच त्यांनी आर्णी तालुक्यातील तरोडा गावाला भेट दिली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या आग्रमन रहाटे यांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे पाच लाखांची मदत आठवले यांनी जाहीर केली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी रहाटे कुटुंबीयांनी केल्याची माहिती आठवले यांनी दिली. आता गडचिरोलीतील डीवायएसपींचीही चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करू, असे आठवले म्हणाले.जलयुक्त शिवार फेलस्वातंत्र्याला ७२ वर्ष होत असतानाही जनता पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहे. हे चांगले नाही. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार सुरू केले. तरी आजही पाणीटंचाई दिसत आहे. हे जलयुक्त शिवार फेल झाल्याचेच लक्षण आहे. पण यापूर्वीच्या सरकारनेही बाबासाहेबांच्या नदी जोड कार्यक्रमावर लक्ष दिले नाही. जे माणसं जोडू शकले नाही, ते नद्या काय जोडतील, अशा शेलक्या शब्दात आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर संधान साधले.उमरखेड विधानसभा मतदारसंघावर रिपाइंचा दावालोकसभेसाठी एकही जागा लढवली नसली, तरी विधानसभा रिपब्लिकन पार्टी लढवणार आहे. विशेषत: उमरखेडची जागा रिपाइंसाठी मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, मोहन भोयर, सुधाकर तायडे, आर.एस.वानखडे, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रभाकर जीवने, अ‍ॅड. जीवने, कल्पना मेश्राम, नवनीत महाजन उपस्थित होते.नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी बनावेनक्षलवाद हा कधीही दलित-आदिवासींना न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी लोकशाही मार्गाने सत्ता मिळविणे हाच पर्याय आहे. उलट नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी बनावे. हिंसेने कोणाचेच भले होत नाही. ते शांततेच्या मार्गाने मुख्य प्रवाहात येणार असतील, तर त्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेwater shortageपाणीटंचाई