शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

बाबासाहेबांच्या ‘नदी जोड’कडे दुर्लक्ष झाल्यानेच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:38 IST

सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नोंदविले.

ठळक मुद्देरामदास आठवले : दुष्काळी गावात भेट, शहिदाच्या कुटुंबाला पाच लाख

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नोंदविले.शुक्रवारी दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आठवले जिल्ह्यात आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जाम गावात पाहणी केली. तेथे वीजबिल थकित असल्याने गावाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. लोकांनी ही व्यथा आपल्यापुढे मांडली. अशीच स्थिती अनेक गावात आहे. आता या दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देताना, अशा गावांचे वीजबिल माफ करण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ हटविण्यासाठी केंद्रातून निधी मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण कायमस्वरुपी उपाय बाबासाहेबांच्या नदी जोड कार्यक्रमातूनच होणार आहे. मुंबई, कोकण या भागात अधिक पाऊस पडतो. तेथील नद्यांचे पाणी अडवून कमी पाऊस पडणाºया विदर्भ-मराठवाड्यातील नद्यांमध्ये सोडले जावे. विदर्भातही आणखी मोठे डॅम बांधण्याची गरज आहे.दरम्यान, दुष्काळी गावांची पाहणी करतानाच त्यांनी आर्णी तालुक्यातील तरोडा गावाला भेट दिली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या आग्रमन रहाटे यांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे पाच लाखांची मदत आठवले यांनी जाहीर केली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी रहाटे कुटुंबीयांनी केल्याची माहिती आठवले यांनी दिली. आता गडचिरोलीतील डीवायएसपींचीही चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करू, असे आठवले म्हणाले.जलयुक्त शिवार फेलस्वातंत्र्याला ७२ वर्ष होत असतानाही जनता पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहे. हे चांगले नाही. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार सुरू केले. तरी आजही पाणीटंचाई दिसत आहे. हे जलयुक्त शिवार फेल झाल्याचेच लक्षण आहे. पण यापूर्वीच्या सरकारनेही बाबासाहेबांच्या नदी जोड कार्यक्रमावर लक्ष दिले नाही. जे माणसं जोडू शकले नाही, ते नद्या काय जोडतील, अशा शेलक्या शब्दात आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर संधान साधले.उमरखेड विधानसभा मतदारसंघावर रिपाइंचा दावालोकसभेसाठी एकही जागा लढवली नसली, तरी विधानसभा रिपब्लिकन पार्टी लढवणार आहे. विशेषत: उमरखेडची जागा रिपाइंसाठी मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, मोहन भोयर, सुधाकर तायडे, आर.एस.वानखडे, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रभाकर जीवने, अ‍ॅड. जीवने, कल्पना मेश्राम, नवनीत महाजन उपस्थित होते.नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी बनावेनक्षलवाद हा कधीही दलित-आदिवासींना न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी लोकशाही मार्गाने सत्ता मिळविणे हाच पर्याय आहे. उलट नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी बनावे. हिंसेने कोणाचेच भले होत नाही. ते शांततेच्या मार्गाने मुख्य प्रवाहात येणार असतील, तर त्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेwater shortageपाणीटंचाई