शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

हटखोर पावसामुळे जिल्ह्यात अर्धी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:08 PM

मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : तुरळक ठिकाणी सरी कोसळल्याने पिकांना संजीवनी, सरासरी उत्पन्नाचीही आशा मावळली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोळपली आहे. जवळपास ३० टक्के पेरणी पूर्णत: नष्ट झाल्याचा अंदाज कृषी खात्याकडून वर्तविला जात आहे.हमखास पाऊस बरसणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. यावर्षीच्या पावसाने ही ओळख पुसून काढण्याचेच काम सुरू केले आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाच संकटात सापडला आहे. याची सर्वाधिक झळ शेतकरी कुटुंबाला बसली आहे. कृषी उत्पादनात घट होण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.विपूल निसर्ग संपदा लाभलेला जिल्ह्याला वरूणराजाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाºया जून, जुलै महिन्यातच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पीक जगवायचे तरी कसे असा प्रश्न प्रत्येकांपुढे उभा ठाकला आहे. या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाकडे साकडे घातले आहे.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब चिंतेत आहेत. पाऊस बरसावा इतकीच विनंती ते वरूण राजाला करीत आहे. काही मोजक्या गावामध्ये पाऊस बरसला. अनेक ठिकाणी हा पाऊस बरसलाच नाही. यामुळे काही ठिकाणी पिके वाचली तर अनेक ठिकाणी पिके करपली, असे विरोधाभासी चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.जुलै आणि आॅगस्टचा पाऊस महत्त्वाचासाधारणता जूनमध्ये १५० मिमी, जुलै आणि आॅगस्टमध्ये प्रत्येकी ३५० मिमी पाऊस बरसतो. जून ते जुलैपर्यंत १३९ मिमी इतकाच पाऊस यावर्षी आला आहे. जुलैमध्ये पावसाची मोठी उघडीप राहिली. सर्वाधिक पाऊस पडणाºया महिन्यातच पाऊस गायब आहे. यामुळे भविष्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणे भरणार किंवा नाही हे सांगणे अवघड झाले आहे. एकूणच विदारक चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.