शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

दिग्रस तालुक्याला दुष्काळातून डावलल्याने रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:39 IST

राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे. दुष्काळी यादीमध्ये दिग्रसचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.शासनाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्येच दुष्काळ सदृश स्थिती जाहीर करीत इतर तालुक्यांवर अन्याय केला आहे. दुष्काळाची झळ सर्व १६ ही तालुक्यांना सारखीच बसत आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, असे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, केळापूर आणि यवतमाळ या तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. वास्तविक यंदा संपूर्ण जिल्ह्यातच पावसाची अनियमितता होती. पावसात खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली आहे. असे असतानाही दुष्काळी यादीत दिग्रसला स्थान दिले गेले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.१६ ही तालुक्यांमध्ये सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर मधल्या काळात बराच खंड पडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, नागरिकांना दुष्काळी सवलतींचा लाभ देण्यात यावा, अशी भूमिका महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही घेतली आहे. शिवसेनेच्या दिग्रस शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्यावतीने याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजय कुकडी, नगरसेवक डॉ. संदीप दुधे, नगरसेवक केतन रत्नपारखी, राहूल गाडे, संदीप रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, अजय भोयर, रमाकांत काळे, शेखर चांदेकर, गोपाल राठोड, नितीन सोनुलकर, चेतन श्रीवास, ललित राठोड, कैलास तायडे, अमोल राठोड आदी उपस्थित होते.सोयाबीन, कापसात घटदिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकत्याच निघालेल्या सोयाबीनचा उताराही कमी आहे. दाणा परिपक्व नसल्याने योग्य भावही मिळणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी कापसाची प्रतवारीसुद्धा घसरली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी