शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दिग्रस तालुक्याला दुष्काळातून डावलल्याने रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:39 IST

राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : राज्य शासनाने प्रचंड अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली. मात्र दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना दिग्रस तालुका वगळण्यात आला. या उपेक्षेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील नागरिक संतापले आहे. दुष्काळी यादीमध्ये दिग्रसचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.शासनाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्येच दुष्काळ सदृश स्थिती जाहीर करीत इतर तालुक्यांवर अन्याय केला आहे. दुष्काळाची झळ सर्व १६ ही तालुक्यांना सारखीच बसत आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, असे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, केळापूर आणि यवतमाळ या तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. वास्तविक यंदा संपूर्ण जिल्ह्यातच पावसाची अनियमितता होती. पावसात खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली आहे. असे असतानाही दुष्काळी यादीत दिग्रसला स्थान दिले गेले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.१६ ही तालुक्यांमध्ये सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर मधल्या काळात बराच खंड पडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, नागरिकांना दुष्काळी सवलतींचा लाभ देण्यात यावा, अशी भूमिका महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही घेतली आहे. शिवसेनेच्या दिग्रस शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्यावतीने याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजय कुकडी, नगरसेवक डॉ. संदीप दुधे, नगरसेवक केतन रत्नपारखी, राहूल गाडे, संदीप रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, अजय भोयर, रमाकांत काळे, शेखर चांदेकर, गोपाल राठोड, नितीन सोनुलकर, चेतन श्रीवास, ललित राठोड, कैलास तायडे, अमोल राठोड आदी उपस्थित होते.सोयाबीन, कापसात घटदिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकत्याच निघालेल्या सोयाबीनचा उताराही कमी आहे. दाणा परिपक्व नसल्याने योग्य भावही मिळणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी कापसाची प्रतवारीसुद्धा घसरली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी