शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले.

ठळक मुद्देसोनवाढोणात टंचाई : वन विभागाने फोडली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील सोनवाढोणा येथे दहा किलोमीटर अंतरावरच्या येलगुंडा येथून पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीच येत नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीने जुनी पाईपलाईन कुचकामी झाल्याने नवी टाकण्यासाठी ७० लाखांच्या निविदा बोलाविल्या. प्रत्यक्ष पाणीटंचाईच्या कारणाचा शोध घेतला असता वनविभागाकडून पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघड झाला.मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले. या गंभीर प्रकारामुळे सोनवाढोणा येथे गेल्या काही महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीनेही काही तपासणी न करता नवीन पाईपलाईनसाठी प्रस्ताव तयार केला. ७१ लाख रुपयांच्या नवीन पाईपलाईनची निविदा काढण्यात आली. वनविभागाच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. वनविभागात काही अधिकारीच दुसऱ्यांच्या नावाने ठेकेदारी करतात. हाच प्रकार मालखेड वनपरिक्षेत्रात जोरात सुरू आहे. त्यातूनच निर्ढावलेल्या अधिकारी, कंत्राटदाराने चक्क गावाला पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर सुरू केला. आता संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय वृक्षांना पाणी देण्याच्या नावावर वनविभागाकडून काढलेली देयकाची रक्कमही संबंधितांकडून वसूल व्हावी, अशी मागणी होत आहे. पाणी वापराचा गैरप्रकार उघड होण्यास करण्यास झालेल्या विलंबाबद्दलही नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.वनविभागाच्या कारवाईकडे लक्षसर्वसामान्य व्यक्तीने पाण्यासाठी एखादा वॉल तोडला तर त्याला गंभीर स्वरूपाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. येथे तर वनविभागातील वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच कायदा हातात घेतला आहे. त्यातही वनविभाग व जिल्हा परिषद प्रशासन या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. वनविभागाची फसवणूक करत वृक्ष लागवड केलेल्या भागाला पाणी दिले आहे. वनरक्षक व कंत्राटदारावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी, अशी मागणी होत आहे.वॉल लिकेज असल्याने पाणी घेतले आहे. मात्र पाईपलाईन फोडून पाणी घेतले असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.- विनोद कोव्हळे,वनपरिक्षेत्र अधिकारी, नेरसदर गैरप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करण्यात आली. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली जाईल. पाणी वापराचा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे, याची माहिती जाणून घेतली जात आहे.- मिलिंद भगत,सरपंच, सोनवाढोणा, ता.नेर

 

टॅग्स :Waterपाणी