शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

‘डीपीसी’ने रोखला जिल्हा परिषदेचा निधी

By admin | Updated: January 15, 2016 03:12 IST

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विकास कामासाठी निधीच दिला जात नसल्याची ओरड सुरू आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक : पुन्हा अधिकाराचा वाद पेटण्याची चिन्हे यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विकास कामासाठी निधीच दिला जात नसल्याची ओरड सुरू आहे. या संदर्भात ज्येष्ठ सदस्यांनी अध्यक्षांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी चर्चाही केली. स्वायत्ता संस्था असलेल्या जिल्हा परिषदेला नियोजनचा निधी वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशा स्थितीत समिती सचिवाकडून केले जात असलेली कोंडी चुकीची असल्याचे अनेक सदस्यांनी बोलून दाखविले. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद यांच्यात निधीवरून पुन्हा वाजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा नियोजन समितीला विकास कामांचा निधी थांबविण्याचा अधिकार नाही. नियोजन समितीने केवळ कामांचा प्राधान्यक्रम तपासावा, झालेल्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र घ्यावे, एवढीच त्यांची जबाबादारी आहे. जिल्हा परिषद स्वायत्ता संस्था असून ग्रामीण भागातील विकास कामात महत्वाची भूमिका बजावते. नियोजन समितीने सर्वच हेडवरचा निधी कमी-अधिक प्रमाणात रोखून धरला आहे. आर्थिक वर्ष संपत असताना केवळ जुना निधी खर्च झाला नाही, अशी सबब पुढे करून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सदस्यांकडून होत आहे. यावरच अध्यक्षांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. नियोजन समितीने सामान्य कामावरचे आठ कोटी, आदिवासी बहुल क्षेत्रातील कामाचे २०९.२५ कोटी, गैरआदिवासी क्षेत्र व किमान गरजा कार्यक्रमांचे १७४.८० कोटी, यात्रास्थळ विकास योजनेचे ३८४.५३ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचे ११७ कोटी, आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे ११७ कोटी थांबविण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर नियोजन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. यातून तर हा वाद निर्माण केला जातो काय असा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी आघाडी शासनाच्या काळात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसचे नियोजन समितीवर वर्चस्व होते. तेव्हासुद्धा नियोजन समितीच्या निधीवरून जिल्हा परिषदेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत होता. विकास कामांचा निधीच खर्च होत नसल्याची सबब पुढे केली जात होती. या वादातच ग्रामीण भागातील अनेक मूलभूत गरजांची कामे पूर्णच झाली नाही. आतासुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. नियोजन समितीची अर्थसंकल्पीय दृष्टीकोणातून सभा होणार आहे. या सभेत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यात एकमत झाले असून सभेमध्ये आक्रमक पवित्रा घेऊन नियोजन समितीचा निधी लवकर रिलीज करावा, अशी मागणी केली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)