शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

‘डीपीसी’ने रोखला जिल्हा परिषदेचा निधी

By admin | Updated: January 15, 2016 03:12 IST

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विकास कामासाठी निधीच दिला जात नसल्याची ओरड सुरू आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक : पुन्हा अधिकाराचा वाद पेटण्याची चिन्हे यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विकास कामासाठी निधीच दिला जात नसल्याची ओरड सुरू आहे. या संदर्भात ज्येष्ठ सदस्यांनी अध्यक्षांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी चर्चाही केली. स्वायत्ता संस्था असलेल्या जिल्हा परिषदेला नियोजनचा निधी वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशा स्थितीत समिती सचिवाकडून केले जात असलेली कोंडी चुकीची असल्याचे अनेक सदस्यांनी बोलून दाखविले. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद यांच्यात निधीवरून पुन्हा वाजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा नियोजन समितीला विकास कामांचा निधी थांबविण्याचा अधिकार नाही. नियोजन समितीने केवळ कामांचा प्राधान्यक्रम तपासावा, झालेल्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र घ्यावे, एवढीच त्यांची जबाबादारी आहे. जिल्हा परिषद स्वायत्ता संस्था असून ग्रामीण भागातील विकास कामात महत्वाची भूमिका बजावते. नियोजन समितीने सर्वच हेडवरचा निधी कमी-अधिक प्रमाणात रोखून धरला आहे. आर्थिक वर्ष संपत असताना केवळ जुना निधी खर्च झाला नाही, अशी सबब पुढे करून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सदस्यांकडून होत आहे. यावरच अध्यक्षांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. नियोजन समितीने सामान्य कामावरचे आठ कोटी, आदिवासी बहुल क्षेत्रातील कामाचे २०९.२५ कोटी, गैरआदिवासी क्षेत्र व किमान गरजा कार्यक्रमांचे १७४.८० कोटी, यात्रास्थळ विकास योजनेचे ३८४.५३ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचे ११७ कोटी, आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे ११७ कोटी थांबविण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर नियोजन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. यातून तर हा वाद निर्माण केला जातो काय असा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी आघाडी शासनाच्या काळात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसचे नियोजन समितीवर वर्चस्व होते. तेव्हासुद्धा नियोजन समितीच्या निधीवरून जिल्हा परिषदेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत होता. विकास कामांचा निधीच खर्च होत नसल्याची सबब पुढे केली जात होती. या वादातच ग्रामीण भागातील अनेक मूलभूत गरजांची कामे पूर्णच झाली नाही. आतासुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. नियोजन समितीची अर्थसंकल्पीय दृष्टीकोणातून सभा होणार आहे. या सभेत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यात एकमत झाले असून सभेमध्ये आक्रमक पवित्रा घेऊन नियोजन समितीचा निधी लवकर रिलीज करावा, अशी मागणी केली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)