शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डीजेच्या नादात वापस गेली वरात... वाजत आले, लाजत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:52 IST

लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ्या नवरदेवाला चांगलाच हिसका दाखवला.

ठळक मुद्देवाजंत्री बहु गलबला न करणे.... शुभमंगल सावधान!

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ्या नवरदेवाला चांगलाच हिसका दाखवला. डीजे लावून नाचण्यात मश्गूल असलेल्या वरातीला तिने ‘गो बॅक’ म्हटले. मग चिडलेल्या गावकऱ्यांनीही ही वरात थेट गावाबाहेरच पिटाळून लावली.लग्नात बेभान नाचण्याची हौस करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आर्णी तालुक्यातील पिंपळनेर गावात शुक्रवारी घडली. स्वाती शिवदास आडे या तरुणीचा शारी गावातील युवकासोबत विवाह ठरला होता. शुक्रवारी वधूमंडपी लग्नाची जय्यत तयारी झाली होती. पण वरात गावात आली, तरी मांडवात येईना. बराच वेळ झाला, वधूपक्षाकडील पाहुणेही कंटाळून गेले. अखेर काही जणांनी शोध घेतला असता वराकडील पाहुणे नुसते डीजेच्या तालावर नाचण्यातच बेभान झाल्याचे कळले. शेवटी लग्न वेळेवर लावण्यासाठी वधूचे काका वरातीपर्यंत पोहोचले. त्यांनी नाचणाऱ्या युवकांना मंडपात येण्याची विनंती केली. मात्र बेधुंद युवकांनी काकांना विरोध करीत चक्क धक्काबुक्की केली. हे दृश्य पाहताच पिंपळनेर गावातील लोकही चिडले. वाद वाढला. ही वार्ता वधू स्वातीपर्यंत पोहोचली. वडील नसलेल्या स्वातीची सर्व जबाबदारी काकांनीच सांभाळली. त्यामुळे काकाचा अपमान ती सहन करू शकली नाही. यातच तिने अशा मुलांशी लग्नच करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. काका आणि भावानेही स्वातीच्या निर्णयाला दुजोरा दिला. मग पिंपळनेर गावकºयांनी नाचणाºया वरपक्षाची चांगलीच ‘वरात काढली’. डीजे सकट सर्वांना गावाबाहेर पिटाळून लावले. वाजत गाजत आलेली शारी येथील वरात लाजत लाजत परत गेली. वाद मिटविण्यासाठी पोलीसही पोहोचले. मात्र वरात परत गेलीच. या प्रकाराने लग्नातील नाचण्याच्या अनाठायी हौसेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. लग्नासारख्या पवित्र प्रसंगाला काही जण गालबोट लावतात. त्यामुळे वाजंत्री बहु गलबला न करणे या मंगलाष्टकाचा अर्थ लक्षात घेऊन वºहाड्यांनी सावधान होण्याची गरज आहे.ऐनवेळी निरंजनने राखली प्रतिष्ठाबेभान झालेल्या वरातीवर संताप व्यक्त करीत स्वातीने शारीच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दिवसभर वधू मंडपात संतापाचे आणि काळजीचे वातावरण होते. मात्र सायंकाळ होता होता स्वातीच्याच आत्याचा शेतकरी मुलगा निरंजन उत्तम राठोड हा स्वातीशी लग्न करण्यासाठी मांडवात उभा राहिला. सायंकाळी सर्व पाहुण्यांच्या आशीर्वादात स्वाती निरंजनसोबत विवाह करून महाळूंगीकडे रवाना झाली. केवळ नववीपर्यंत शिकलेल्या स्वातीने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :marriageलग्न