शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या नादात वापस गेली वरात... वाजत आले, लाजत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:52 IST

लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ्या नवरदेवाला चांगलाच हिसका दाखवला.

ठळक मुद्देवाजंत्री बहु गलबला न करणे.... शुभमंगल सावधान!

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ्या नवरदेवाला चांगलाच हिसका दाखवला. डीजे लावून नाचण्यात मश्गूल असलेल्या वरातीला तिने ‘गो बॅक’ म्हटले. मग चिडलेल्या गावकऱ्यांनीही ही वरात थेट गावाबाहेरच पिटाळून लावली.लग्नात बेभान नाचण्याची हौस करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आर्णी तालुक्यातील पिंपळनेर गावात शुक्रवारी घडली. स्वाती शिवदास आडे या तरुणीचा शारी गावातील युवकासोबत विवाह ठरला होता. शुक्रवारी वधूमंडपी लग्नाची जय्यत तयारी झाली होती. पण वरात गावात आली, तरी मांडवात येईना. बराच वेळ झाला, वधूपक्षाकडील पाहुणेही कंटाळून गेले. अखेर काही जणांनी शोध घेतला असता वराकडील पाहुणे नुसते डीजेच्या तालावर नाचण्यातच बेभान झाल्याचे कळले. शेवटी लग्न वेळेवर लावण्यासाठी वधूचे काका वरातीपर्यंत पोहोचले. त्यांनी नाचणाऱ्या युवकांना मंडपात येण्याची विनंती केली. मात्र बेधुंद युवकांनी काकांना विरोध करीत चक्क धक्काबुक्की केली. हे दृश्य पाहताच पिंपळनेर गावातील लोकही चिडले. वाद वाढला. ही वार्ता वधू स्वातीपर्यंत पोहोचली. वडील नसलेल्या स्वातीची सर्व जबाबदारी काकांनीच सांभाळली. त्यामुळे काकाचा अपमान ती सहन करू शकली नाही. यातच तिने अशा मुलांशी लग्नच करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. काका आणि भावानेही स्वातीच्या निर्णयाला दुजोरा दिला. मग पिंपळनेर गावकºयांनी नाचणाºया वरपक्षाची चांगलीच ‘वरात काढली’. डीजे सकट सर्वांना गावाबाहेर पिटाळून लावले. वाजत गाजत आलेली शारी येथील वरात लाजत लाजत परत गेली. वाद मिटविण्यासाठी पोलीसही पोहोचले. मात्र वरात परत गेलीच. या प्रकाराने लग्नातील नाचण्याच्या अनाठायी हौसेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. लग्नासारख्या पवित्र प्रसंगाला काही जण गालबोट लावतात. त्यामुळे वाजंत्री बहु गलबला न करणे या मंगलाष्टकाचा अर्थ लक्षात घेऊन वºहाड्यांनी सावधान होण्याची गरज आहे.ऐनवेळी निरंजनने राखली प्रतिष्ठाबेभान झालेल्या वरातीवर संताप व्यक्त करीत स्वातीने शारीच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दिवसभर वधू मंडपात संतापाचे आणि काळजीचे वातावरण होते. मात्र सायंकाळ होता होता स्वातीच्याच आत्याचा शेतकरी मुलगा निरंजन उत्तम राठोड हा स्वातीशी लग्न करण्यासाठी मांडवात उभा राहिला. सायंकाळी सर्व पाहुण्यांच्या आशीर्वादात स्वाती निरंजनसोबत विवाह करून महाळूंगीकडे रवाना झाली. केवळ नववीपर्यंत शिकलेल्या स्वातीने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :marriageलग्न