शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

राज्य शासनाचा नेहमीचाच कित्ता : ना दुष्काळी मदत, ना अग्रीमचा पत्ता..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 17:37 IST

दिवाळी तोंडावर, शेतकऱ्यांचं दिवाळं, सोयाबीन, कापूस हमी भावाच्या खाली

मारेगाव (यवतमाळ) : पावासाळ्यात अतिवृष्टी, त्यानंतर पावसात मोठा खंड आणि नंतर सोयाबीन पिकावरील यलो मोझॅकमुळे पीक हातचे गेले, तर कापूस उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आली आहे. त्यामुळे पीक विम्याचे अग्रीम मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना होती. दुसरीकडे शासनाकडून दुष्काळी मदत मिळेल, ही आशा होती. मात्र, दिवाळी तोंडावर आली असतानाही शासनाची कोणतीही मदत शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही. त्यामुळे ना दुष्काळ ना अग्रीमचा पत्ता. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, आम्ही दिवाळी साजरी करायची तरी कशी, असा प्रश्न पुढे येत आहे.

यावर्षी तालुक्यात ३४ हजार हेक्टरवर सोयाबीन व कापूस पिकाची लागवड झाली. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आणि वर्धा नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचे पंचनामे केले. पण, अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. नुकतेच राज्य शासनाने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. काही ठिकाणी विम्याची अग्रीम देण्याच्याही सूचना केल्या. मात्र, यात विदर्भातील नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येऊन अद्याप ना अग्रीमची रक्कम मिळाली, ना तालुक्याचा दुष्काळात समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार का, असा प्रश्न आहे. दिवाळीच्या तोंडावर शासनाने सोयाबीन नुकसान पाहणीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले. कृषी विभागाने तात्पुरता दाखवत नुकसानीचे पंचनामे केले. परंतु, नुकसान भरपाई मिळणार काय? आणि किती मिळणार आणि कधी मिळणार, याबाबत कोणीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मदतीकडे आस लावून बसला आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

आज तालुक्यातील शेतकरी आस्मानी संकटात आहे. नापिकीची मोठी झळ सोसावी लागत आहे. यातच शेतमालाचे भाव कोसळले आहेत. राज्यात सोयाबीन, कापूस पिकांना मिळणाऱ्या भावापेक्षा तालुक्यात कापूस, सोयाबीनची खरेदी कमी दरात सुरु आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पिळवणूक सुरू आहे. त्यातच वजन काट्यात पाप असल्याची ओरड शेतकरी करीत आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी होत असताना मात्र लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

वीज अधिकाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमचे काय झाले

तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन ठप्प झाले आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके सुकून जात आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन वीज वितरणच्या अभियंत्यांना धारेवर धरत ३१ ऑक्टोबरपर्यंत दिवसा वीज पुरवठा द्या. अन्यथा आंदोलन करू, असा अल्टिमेटम दिला होता. अल्टीमेटमची मुदत संपून आठवडा झाला. त्यामुळे शेतकरी अल्टीमेटमचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारYavatmalयवतमाळ