शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचा नेहमीचाच कित्ता : ना दुष्काळी मदत, ना अग्रीमचा पत्ता..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 17:37 IST

दिवाळी तोंडावर, शेतकऱ्यांचं दिवाळं, सोयाबीन, कापूस हमी भावाच्या खाली

मारेगाव (यवतमाळ) : पावासाळ्यात अतिवृष्टी, त्यानंतर पावसात मोठा खंड आणि नंतर सोयाबीन पिकावरील यलो मोझॅकमुळे पीक हातचे गेले, तर कापूस उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आली आहे. त्यामुळे पीक विम्याचे अग्रीम मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना होती. दुसरीकडे शासनाकडून दुष्काळी मदत मिळेल, ही आशा होती. मात्र, दिवाळी तोंडावर आली असतानाही शासनाची कोणतीही मदत शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही. त्यामुळे ना दुष्काळ ना अग्रीमचा पत्ता. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, आम्ही दिवाळी साजरी करायची तरी कशी, असा प्रश्न पुढे येत आहे.

यावर्षी तालुक्यात ३४ हजार हेक्टरवर सोयाबीन व कापूस पिकाची लागवड झाली. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आणि वर्धा नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचे पंचनामे केले. पण, अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. नुकतेच राज्य शासनाने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. काही ठिकाणी विम्याची अग्रीम देण्याच्याही सूचना केल्या. मात्र, यात विदर्भातील नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येऊन अद्याप ना अग्रीमची रक्कम मिळाली, ना तालुक्याचा दुष्काळात समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार का, असा प्रश्न आहे. दिवाळीच्या तोंडावर शासनाने सोयाबीन नुकसान पाहणीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले. कृषी विभागाने तात्पुरता दाखवत नुकसानीचे पंचनामे केले. परंतु, नुकसान भरपाई मिळणार काय? आणि किती मिळणार आणि कधी मिळणार, याबाबत कोणीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मदतीकडे आस लावून बसला आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

आज तालुक्यातील शेतकरी आस्मानी संकटात आहे. नापिकीची मोठी झळ सोसावी लागत आहे. यातच शेतमालाचे भाव कोसळले आहेत. राज्यात सोयाबीन, कापूस पिकांना मिळणाऱ्या भावापेक्षा तालुक्यात कापूस, सोयाबीनची खरेदी कमी दरात सुरु आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पिळवणूक सुरू आहे. त्यातच वजन काट्यात पाप असल्याची ओरड शेतकरी करीत आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी होत असताना मात्र लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

वीज अधिकाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमचे काय झाले

तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन ठप्प झाले आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके सुकून जात आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन वीज वितरणच्या अभियंत्यांना धारेवर धरत ३१ ऑक्टोबरपर्यंत दिवसा वीज पुरवठा द्या. अन्यथा आंदोलन करू, असा अल्टिमेटम दिला होता. अल्टीमेटमची मुदत संपून आठवडा झाला. त्यामुळे शेतकरी अल्टीमेटमचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारYavatmalयवतमाळ