शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आश्विनच्या मूक संवेदनेला सुरेखाची साथ; घाटकिन्हीच्या या अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा

By रवींद्र चांदेकर | Updated: September 4, 2023 17:57 IST

अनोखा विवाहसोहळा, त्यांच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला

दारव्हा (यवतमाळ) : बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरविलेले. त्यातच तो दिव्यांग. मात्र, आता त्याच्या ‘मूक’ संवेदनेला तिची साथ लाभली. तिने त्याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहाची अवघ्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे. 

तालुक्यातील घाटकिन्ही (हनुमाननगर) येथील आश्विन राठोड जन्मताच दिव्यांग आहे. त्याला बोलता येत नाही. शारीरिक व्यंगत्वाचे संकट कमी म्हणून की काय नियतीने त्याच्यावर बालपणीच मोठा आघात केला. तो अवघ्या दोन महिन्यांचा असताना आई मरण पावली. त्यामुळे वडील दारासिंग राठोड यांनी दुसरा विवाह केला. सावत्र आई पार्वतीने त्याचा मायेने सांभाळ केला. परंतु, दोन वर्षांनंतरच वडील दारासिंग यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नंतर मोठे वडील शेषराव राठोड यांनी त्याला साथ दिली.

अमरावती येथील दिव्यांगांच्या शाळेत त्याने शिक्षण घेतले. त्या ठिकाणी इशाऱ्याने संवाद साधण्याची कला आश्विनने अवगत केली. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आले. त्यानंतर गावी परतून त्याने मोलमजुरी करीत कुटुंबाला हातभार लावला. मोठा झाल्यानंतर त्याच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू झाले. मात्र, शारीरिक दिव्यांग असल्याने मोठी अडचण जात होती. अशातच दिग्रस तालुक्यातील साखरा येथील नातेवाईकांच्या माध्यमातून मोखचे स्थळ आले. आश्विनप्रमाणेच दिव्यांग असलेल्या सुरेखाशी विवाह ठरला आणि ३ सप्टेंबरला विवाहसुद्धा पार पडला. या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

सुरेखाच्या एन्ट्रीने जीवनप्रवास सुखकर

आता आश्विनच्या मूक संवेदनेला सुरेखाची साथ मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला आहे. घाटकिन्ही येथे दिव्यांगांचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. मोठ्या उत्साहाने गावकरी त्यात सहभागी झाले. बालपणापासून अनेक संकटे झेलणाऱ्या आश्विनच्या आयुष्यात आता सुरेखाची एन्ट्री झाल्याने त्याचा जीवनप्रवास सुखकर झाला आहे.

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्नYavatmalयवतमाळ