शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आजपासून जिल्हा झाला अनलाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

अत्यावश्यक सेवेची दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने, माॅल, थिएटर, नाट्यगृहे, रेस्टाॅरन्ट, सार्वजनिक जागा, खुले मैदान, वाॅकिंग, सायकलिंग, खासगी कार्यालये नियमित वेळेत सुरु राहणार आहेत. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, शूटिंग, लग्नसमारंभ, अंत्ययात्रा, स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम, बांधकाम, कृषी, ई-काॅमर्स व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू राहतील. जमावबंदी अथवा संचारबंदी लागू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी : कोरोना त्रिसूत्री पाळावीच लागणार, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून बाजारपेठेवर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यापासून तर बाजारपेठ सलग बंदच आहे. मात्र आता कोरोना किंचित आटोक्यात आल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठेवरील निर्बंध सोमवारी ७ जूनपासून हटविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जारी केला.अत्यावश्यक सेवेची दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने, माॅल, थिएटर, नाट्यगृहे, रेस्टाॅरन्ट, सार्वजनिक जागा, खुले मैदान, वाॅकिंग, सायकलिंग, खासगी कार्यालये नियमित वेळेत सुरु राहणार आहेत. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, शूटिंग, लग्नसमारंभ, अंत्ययात्रा, स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम, बांधकाम, कृषी, ई-काॅमर्स व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू राहतील. जमावबंदी अथवा संचारबंदी लागू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय जीम, सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर, सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे. उत्पादन आणि निर्यात करण्यास मुभा दिली आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. खासगी कार, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या ट्रेन सुरु राहणार आहे.  जिल्हा अनलाॅक झाला असताना कोरोना नियमाचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना शंभर रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत दंड होणार आहे. 

दर गुरुवारी घेतला जाणार परिस्थितीचा आढावा - दर गुरुवारी जिल्हा प्रशासन संपूर्ण बाबीचा आढावा घेणार आहे. जिल्ह्यामध्ये लावलेले किंवा शिथिल केलेले निर्बंध योग्य पद्धतीने हाताळले जात आहे का याची माहिती घेतली जाईल. जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध कमी करायचे किंवा पुन्हा निर्बंध घालायचे याचा आढावा घेतला जाईल.  गरज भासल्यास लगतच्या सोमवारपासून आवश्यकतेनुसार निर्णय होईल. यामुळे कोरोना वाढू द्यायचा की रोखायचा हे नागरिकांच्या वर्तनावर अवलंबून राहणार आहे. कोरोना वाढला तर पुन्हा लाॅकडाऊनची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

अत्यावश्यक बाबी मुभा देण्यात आलेल्या आस्थापनाधारकांना नो मास्क नो एन्ट्री असे बोर्ड लावावे लागेल. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी हाेणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. काेविड त्रिसुत्री पाळावी लागेल. यामध्ये मास्क, सोशल डिस्टन्स, हॅंडवाॅश गरजेचा आहे. मंगल कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक आहे.  ­कोरोना त्रिसुत्री पालनासाठी ५० टक्के क्षमतेने कार्यालये, बैठका सुरू ठेवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत. 

जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन केले म्हणून अनलाॅक प्रक्रियेत आपण श्रेणी एकमध्ये आलो आहे. यामुळे आपल्याला सवलत मिळाली आहे. आता पुढील काळातही कोरोना त्रिसूत्रीचे पालन करीत खबरदारी घ्यायची आहे. तरच जिल्हा अनलाॅक राहण्यास मदत होणार आहे. पुढेही प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे.  -अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या