शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मंजूर

By admin | Updated: July 5, 2014 23:48 IST

आमदार वामनराव कासावार यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाने मंजूर केला असून आठवडाभरात नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माहिती : आठवडाभरात नवा जिल्हाध्यक्षयवतमाळ : आमदार वामनराव कासावार यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाने मंजूर केला असून आठवडाभरात नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते पक्षाचे आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या कारभारावर नाराज आहे. त्यातूनच त्यांनी या नेत्यांविरुद्ध रणशिंग फुंकले होते. मात्र ते औटघटकेचे ठरले. या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी आपल्या बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला उपस्थित एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला माहिती दिली. त्यानुसार, कासावारांचा राजीनामा मंजूर झाला आहे. लवकरच नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल, असे ठाकरे यांनी त्यांना सांगितले. जिल्ह्यातील समस्या दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याची गरज नाही. त्यावर येथेच तोडगा काढला जाईल. आमदार आणि त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ नये या मुद्यावर ठाकरे यांनी कोणत्याच पक्षात असे चालत नसते, पक्षाच्या धोरणानुसार उमेदवारी ठरते, त्यात पिता-पूत्र कुणीही बाद होऊ शकतो, असे या पदाधिकाऱ्यांना समजाविले. यावेळी नवा अध्यक्ष हा मंत्री-आमदारांकडून न लादता कार्यकर्त्यांमधून व त्यांच्या संमतीने निवडला जावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी बोलून दाखविली. अधिकारी कार्यकर्त्यांचे ऐकत नाही, मग कार्यकर्त्यांनी जावे कुठे असा प्रश्न उपस्थित केला गेला. वणीपासून उमरखेडपर्यंत सर्व महत्वाचे अधिकारी राजकीय नेत्यांकडे आश्रयाला जाऊन नियुक्ती मिळवितात. काही जण रॉयल्टीही भरतात. मग हे अधिकारी कार्यकर्त्यांचे ऐकणार कशासाठी असा मुद्दा उपस्थित केला गेला. अपर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे हे जिल्ह्यात सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. असे असताना त्यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याऐवजी पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात पीओ म्हणून नियुक्ती देण्याबाबत मंत्र्यांकडून शिफारस केली जाते, एवढेच नव्हे तर अशा अधिकाऱ्याची बदली झाली असताना त्यांना कार्यमुक्त न करता प्रशासनाकडून पाठीशी घातले जाते, याबाबीकडेही प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)