शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 18:07 IST

मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदासने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले.

ठळक मुद्देखैरी येथील घटना : शेतीच्या वादातून केला खून

यवतमाळ : जन्मदात्या पित्यासोबत शेतीच्या वाटणीवरून वाद झाला. याचा राग मनात धरून सर्वात लहान मुलाने चौकीदारी करीत असलेल्या पित्यावर मंगळवारी रात्री चाकूने ३० घाव घातले. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही मन हेलावणारी घटना कळंब तालुक्यातील खैरी येथे घडली.

भीमराव सोनबा घोडाम (६५) असे मृताचे नाव आहे. भीमराव यांना तीन मुले आहेत. थोडीबहुत शेती आहे. या शेतीच्या हिस्सेवाटणीवरूनच घरात कुरबुर सुरू होती. जिवंत असेपर्यंत शेतीची वाटणी होऊ देणार नाही, अशी भूमिका घोडाम यांची होती. ते खैरी येथील तलावाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करीत होते. नेहमीप्रमाणे रात्री ते साइटवर गेले. मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदास भीमराव घोडाम (२६) याने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले. खुनाची घटना सकाळी उघड झाल्यानंतर कळंब पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अभय चौथनकर पथकासह घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळावरची स्थिती पाहून खुनाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच घरगुती शेतीचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली. संशयित हरिदासला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी रुख्मा भीमराव घोडाम यांच्या तक्रारीवरून म्हणजेच आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरोधात कलम ३०२ भादंविनुसार कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटकPoliceपोलिसYavatmalयवतमाळ