शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नेर बाजार समितीत हुकूमशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:15 PM

येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकवडीमोल भावात खरेदी : नाफेडची खरेदी करण्यासाठी खविसंचा नकार

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला. यातच व्यापाºयांचा माल त्यांनी अतिक्रमण करून शेतकºयांच्या जागेवर लावला. शेडमध्येही व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने शेतकरी राजाची स्थिती वाईट झाली आहे.नेर येथील बाजार समिती एकेवेळी नावाजलेली होती. नांदगाव खडेश्वर कांरजा येथील शेतकरी माल घेऊन नेर बाजार समितीत यायचे. मात्र सध्या मोठ्या शेतकºयांनी कांरजा बाजारपेठेत माल पाठवण्यावर जोर दिला आहे. नेर बाजार समितीत शेतकरी लूटल्या जात आहे. संगनमत करून मालाचे दर पाडण्यात आले आहे. विकायच असेल तर विका नाही तर चालते व्हा, या भूमिकेने शेतकरी कवडीमोल भावात माल विकत आहे. शासनाने सोयाबिनचा हमिभाव जरी घोषीत केला तरी नाफेडमार्फत खरेदी सुरू केली नाही, असा कोणताही आदेश खविसला मिळाला नाही. याचा अर्थ शासकीय खरेदीचा फायदा व्यापाºयांनाच करून देण्याकडे कल प्रशासनाचा आहे. गरजू व गरीब शेतकºयांचे रक्त शोषन केल्या जात आहे. मागिल तूर खरेदी ईतकी उशीरा झाली की शेवटी स्वस्त दरात घेतलेल्या तूर खरेदीचा फायदा व्यापाºयांनाच झाला. नाफेडची तूर खरेदीची जबाबदारी खविसवर आहे. परंतु पूर्ण तूर खरेदी हंगामाचे पंधरा लाख रुपये नाफेडकडे आहे. हमाली व मापारी यांचा पैसा खविसने बाजार समितीकडून साठ हजार रुपये उसनवार काढून भरला. नाफेडने अद्यापही आठ हजार ८८८ क्किंटल तुरीचा चुकारा दिला नाही. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे, या अवस्थेत भीक मागून दिवाळी साजरी करण्याची वेळ प्रशासनाने गरीब शेतकºयांवर आणली आहे. आज सोयाबीनचे दर आठशे रुपये व कापसाचे दर अडीच हजार ते तीन हजार रुपये आहेत. यावर शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सभापती रवींद्र राऊत यांना कळल्यावर त्यांनी व्यापाºयांचे अतिक्रमित सोयाबिन उचलण्यास लावले. यावर त्वरीत उपाययोजना करून हुकूमशाही करणाºया व्यापाºयांना लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.नाफेड आणि खविसची भूमिका अस्पष्टसोयाबिनच्या खरेदीबाबत नाफेडने खरीदीचे पत्र खविसला दिल्याचे सांगितले, मात्र खविसला असे कोणतेही पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. तुरीचा चुकारा अजूनही बाकी आहे. खविसला कमीशनही मिळाले नाही. यामुळे पत्र आले तरी पैसे नसल्याने आम्ही खरेदी करणार नसल्याचे खविसचे सचिव देशमुख यांनी सांगितले.