शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 10:29 IST

दहावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली.

वणी ( यवतमाळ) : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगतच्या लालगुडा येथे गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सेजल उर्फ मोनू अनिल सालूरकर (१७) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

विशेष म्हणजे तिला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा तिला होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात सेजलला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. गुरूवारी सकाळी घरी कुणी नसताना तिने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना उघडकीस आल्यानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

मृत सेजल ही वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात बारावीच्या कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. सेजलचे वडील अनिल सालूरकर हे मिस्त्रीचे काम करतात, तर आई एका दालमीध्ये मोलमजुरी करते. अचानक घडलेल्या या घटनेने सेजलचे कुटुंबीय हादरून गेले आहे. सेजलला सोनू नामक मोठी बहीण असून, ती यवतमाळ येथे कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यूHSC Exam Resultबारावी निकालyavatmal-acयवतमाळ