शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

दाट जंगल, त्यात वाघ अन् आता अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:33 IST

कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.

ठळक मुद्दे१४ तासांचे अघोरी भारनियमन : वाघग्रस्त गावकऱ्यांनी बाईक रॅली काढून मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, झाडकिन्ही, किनवट, अंतरगाव, मेटिखेडा, पिंपळशेंडा या गावातील नागरिकांनी गुरूवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी केली. या भागामध्ये वाघाची चांगलीच दहशत आहे. यातील पिंपळशेंडा गावात वाघाने एका व्यक्तीला ठार केले होेते. अलीकडे चार ते पाच दिवसांपासून या भागात वाघ दिसल्याची चर्चा आहे. यासोबतच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने दवंडी देऊन शेतशिवाराकडे जाण्यास मज्जाव केला आहे.अशा स्थितीत रात्रीला भारनियमन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गावांनी कृषी फिडरवर टाकण्यात आले आहे. यामुळे या गावामध्ये १४ तासाचे भारनियमन होत आहे. भारनियमनाच्या ‘शेड्यूल’ व्यतिरिक्त होणारे भारनियमन वेगळेच आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी आम्ही गावात राहायचे की नाही, असा थेट प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकांना विचारला.या भागात सकाळी ७ ते सायंकाळी चारपर्यंत वीज नसते. सायंकाळी ७ पासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा वीज गुल असते. याच अंधारात वाघ गावामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यातूनच संपूर्ण गाव दहशतीत आहे. शेतीकरिता रात्रीलाच वीज दिली जाते. या भागात वाघ असल्याची दहशत आहे. यामुळे शेतामधील ओलित थांबले आहे. कापूस, तूर आणि रब्बीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. गावामधील दहशत दूर करण्यासाठी रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.यावेळी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विजय राठोड, कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, डोंगरखर्डाचे सरपंच निश्चल ठाकरे, सुरेंद्र चिंचोळकर, सुधाकर निखाडे, गणेश जाधव, रतीलाल पवार, दरणे पाटील, देवानंद वरफडे, प्रमोद मुनेश्वर, शेख आरीफ, विनोद पंचबुध्दे, सुभाष काकडे, शामलाल जयस्वाल, सिध्दार्थ पाटील, रमेश काचोरे, विठ्ठल येबरे, शेख सादीक उपस्थित होते.ऊर्जा राज्यमंत्र्यांचे उपाययोजनेचे आदेशवाघाच्या दहशतीमुळे कळंब तालुक्यातील अनेक गावे दडपणात आहे. अशा वेळी भारनियमन होत असल्याने भीती वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यापुढे मांडली. त्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात भारनियमन न थांबल्यास आंदोलनाचा इशारा गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघelectricityवीज