शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दाट जंगल, त्यात वाघ अन् आता अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:33 IST

कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.

ठळक मुद्दे१४ तासांचे अघोरी भारनियमन : वाघग्रस्त गावकऱ्यांनी बाईक रॅली काढून मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, झाडकिन्ही, किनवट, अंतरगाव, मेटिखेडा, पिंपळशेंडा या गावातील नागरिकांनी गुरूवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी केली. या भागामध्ये वाघाची चांगलीच दहशत आहे. यातील पिंपळशेंडा गावात वाघाने एका व्यक्तीला ठार केले होेते. अलीकडे चार ते पाच दिवसांपासून या भागात वाघ दिसल्याची चर्चा आहे. यासोबतच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने दवंडी देऊन शेतशिवाराकडे जाण्यास मज्जाव केला आहे.अशा स्थितीत रात्रीला भारनियमन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गावांनी कृषी फिडरवर टाकण्यात आले आहे. यामुळे या गावामध्ये १४ तासाचे भारनियमन होत आहे. भारनियमनाच्या ‘शेड्यूल’ व्यतिरिक्त होणारे भारनियमन वेगळेच आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी आम्ही गावात राहायचे की नाही, असा थेट प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकांना विचारला.या भागात सकाळी ७ ते सायंकाळी चारपर्यंत वीज नसते. सायंकाळी ७ पासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा वीज गुल असते. याच अंधारात वाघ गावामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यातूनच संपूर्ण गाव दहशतीत आहे. शेतीकरिता रात्रीलाच वीज दिली जाते. या भागात वाघ असल्याची दहशत आहे. यामुळे शेतामधील ओलित थांबले आहे. कापूस, तूर आणि रब्बीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. गावामधील दहशत दूर करण्यासाठी रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.यावेळी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विजय राठोड, कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, डोंगरखर्डाचे सरपंच निश्चल ठाकरे, सुरेंद्र चिंचोळकर, सुधाकर निखाडे, गणेश जाधव, रतीलाल पवार, दरणे पाटील, देवानंद वरफडे, प्रमोद मुनेश्वर, शेख आरीफ, विनोद पंचबुध्दे, सुभाष काकडे, शामलाल जयस्वाल, सिध्दार्थ पाटील, रमेश काचोरे, विठ्ठल येबरे, शेख सादीक उपस्थित होते.ऊर्जा राज्यमंत्र्यांचे उपाययोजनेचे आदेशवाघाच्या दहशतीमुळे कळंब तालुक्यातील अनेक गावे दडपणात आहे. अशा वेळी भारनियमन होत असल्याने भीती वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यापुढे मांडली. त्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात भारनियमन न थांबल्यास आंदोलनाचा इशारा गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघelectricityवीज