शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दाट जंगल, त्यात वाघ अन् आता अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:33 IST

कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.

ठळक मुद्दे१४ तासांचे अघोरी भारनियमन : वाघग्रस्त गावकऱ्यांनी बाईक रॅली काढून मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, झाडकिन्ही, किनवट, अंतरगाव, मेटिखेडा, पिंपळशेंडा या गावातील नागरिकांनी गुरूवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी केली. या भागामध्ये वाघाची चांगलीच दहशत आहे. यातील पिंपळशेंडा गावात वाघाने एका व्यक्तीला ठार केले होेते. अलीकडे चार ते पाच दिवसांपासून या भागात वाघ दिसल्याची चर्चा आहे. यासोबतच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने दवंडी देऊन शेतशिवाराकडे जाण्यास मज्जाव केला आहे.अशा स्थितीत रात्रीला भारनियमन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गावांनी कृषी फिडरवर टाकण्यात आले आहे. यामुळे या गावामध्ये १४ तासाचे भारनियमन होत आहे. भारनियमनाच्या ‘शेड्यूल’ व्यतिरिक्त होणारे भारनियमन वेगळेच आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी आम्ही गावात राहायचे की नाही, असा थेट प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकांना विचारला.या भागात सकाळी ७ ते सायंकाळी चारपर्यंत वीज नसते. सायंकाळी ७ पासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा वीज गुल असते. याच अंधारात वाघ गावामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यातूनच संपूर्ण गाव दहशतीत आहे. शेतीकरिता रात्रीलाच वीज दिली जाते. या भागात वाघ असल्याची दहशत आहे. यामुळे शेतामधील ओलित थांबले आहे. कापूस, तूर आणि रब्बीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. गावामधील दहशत दूर करण्यासाठी रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.यावेळी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विजय राठोड, कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, डोंगरखर्डाचे सरपंच निश्चल ठाकरे, सुरेंद्र चिंचोळकर, सुधाकर निखाडे, गणेश जाधव, रतीलाल पवार, दरणे पाटील, देवानंद वरफडे, प्रमोद मुनेश्वर, शेख आरीफ, विनोद पंचबुध्दे, सुभाष काकडे, शामलाल जयस्वाल, सिध्दार्थ पाटील, रमेश काचोरे, विठ्ठल येबरे, शेख सादीक उपस्थित होते.ऊर्जा राज्यमंत्र्यांचे उपाययोजनेचे आदेशवाघाच्या दहशतीमुळे कळंब तालुक्यातील अनेक गावे दडपणात आहे. अशा वेळी भारनियमन होत असल्याने भीती वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यापुढे मांडली. त्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात भारनियमन न थांबल्यास आंदोलनाचा इशारा गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघelectricityवीज