शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा डंख वाढतोय; दोन चिमुरड्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:56 IST

जिल्ह्यात २०५ रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णालये हाऊसफुल्ल, विषाणूजन्य आजारांचे थैमान

यवतमाळ : सततच्या ढगाळी वातावरणासह बरसणाऱ्या पावसामुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा विळखा बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०५ रुग्णांची नोंद झाली असून विषाणूजन्य आजारांचे थैमान पसरले आहे. यातून रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. दरम्यान महागाव तालुक्यात डेंग्यूने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून एकावर नांदेड येथे उपचार सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात १४५ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यात १५३ पॉझिटिव्ह रुग्ण नोंदविले गेले आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत विषाणूजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात असते. ढगाळी वातावरणासह बरसणाऱ्या पावसामुळे विषाणूला पोषक असे वातावरण निर्माण होत असल्याने या प्रकारचे आजार वाढतात. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. एलआयझा टेस्टच्या माध्यमातून ही रुग्णसंख्या पुढे आली आहे. याशिवाय स्क्रपटायफसचे आठ रुग्ण जिल्ह्यात आढळले. तर मलेरियाचे तीन रुग्ण जिल्ह्यात आढळले आहे.

वातावरणात वरच्यावर बदल होत आहे. यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत अनेकांना आजाराचा फटका बसला आहे. बाल रुग्णालयात तर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती खासगी रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय इतर रुग्णालयातही मोठ्या व्यक्तींच्या उपचारासाठी गर्दी होत आहे.

ऑक्टोबर महिना धोक्याचा

सतत बरसणाऱ्या पावसाने वस्त्यांमध्ये पाण्याचे डबके साचले आहे. यात मच्छरांची निर्मिती होऊन आजार वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

दोन मुलांचा मृत्यू

महागाव : तालुक्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. डोंगरगाव येथील सहा महिने वयाचा शायान शेख वाजीद आणि हिवरासंगम येथील नऊ महिने वयाची रितीक्षा उर्फ सुरेखा सोनबा राखडे या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर डोंगरगाव येथील सुहाना नामक मुलगी नांदेड येथे उपचार घेत आहे. तिची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तालुका आरोग्य यंत्रणा व जिल्हाधिकारी याबाबत गंभीर दिसत नसल्यामुळे जनतेमध्ये रोष आहे.

हिवरासंगम येथील रितीक्षा उर्फ सुरेखा सोनबा राखडे या मुलीचा डेंग्यू, मलेरियाने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. हे कुटुंब काही दिवसापूर्वी तेलंगणा येथून हिवरासंगम या मूळगावी आले. रितीक्षाला काही दिवसापूर्वी ताप आल्याने यवतमाळ येथे भरती करण्यात आले. खासगीतील महागडे उपचार हे कुटुंब मुलीला देऊ शकले नाही. यवतमाळवरून घरी आणताना २६ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला, तर डोंगरगाव येथील शायान शेख वाजीद या मुलाचा ३० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा

तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र आडे यांच्याबाबत अनेक तक्रारी असूनही गेल्या दीड वर्षापासून ते फुलसावंगी, काळी दौ., प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महागाव तालुका आरोग्य अधिकारी असा तीन ठिकाणांचा प्रभार सांभाळत आहेत. त्यांची मूळ आस्थापना काळी दौलतखान प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. तालुक्यातील डेंग्यू, मलेरियाच्या स्थितीबाबत त्यांना भ्रमणध्वनी केला, तर ते प्रतिसाद देत नाहीत. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या भ्रमणध्वनीवरून त्यांचा मेव्हणा बोलत असल्याचे सांगण्यात आले. महागाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी डेंगू मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये औषधाचा तुटवडा आणि मिळत नसलेले योग्य उपचार, त्यामुळे आरोग्य यंत्रणेविरुद्ध नागरिकांतून चांगला संताप व्यक्त केला जात आहे.

सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, भांडे रिकामे ठेवावे, साचलेल्या ठिकाणी पाणी मोकळे करावे. ताप येताच रुग्णालयात तपासणी करावी, उपचार घ्यावे.

- डॉ. तन्वीर शेख, जिल्हा हिवताप अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूDeathमृत्यूYavatmalयवतमाळ