शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

तिवरंगच्या पुनर्वसनाची मागणी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:36 PM

तालुक्यातील तिवरंग येथील पूर संरक्षक भिंत, पुनर्वसनाची मागणी गेल्या २० वर्षांपासून धूळखात पडून आहे. रविवारी खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट देऊन ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देखासदारांची भेट : भरपावसात तालुक्यात दौरा, ग्रामस्थांकडून पुनर्वसनासाठी साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील तिवरंग येथील पूर संरक्षक भिंत, पुनर्वसनाची मागणी गेल्या २० वर्षांपासून धूळखात पडून आहे. रविवारी खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट देऊन ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.तिवरंग येथील नाला काठावरील ८६ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी २००५ पासून धूळखात पडून आहे. पूर आल्यानंतर तेवढ्यापुरती धावपळ करायची आणि पूर ओसरला की सर्व विसरून जायचे, असा प्रकार सुरू आहे. तेथे नाल्याच्या काठावर किमान १०० कुटुंबे कसेबसे वास्तव्य करीत आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ८०० च्या घरात आहे. लोकसंख्या वाढत असताना भौगोलिक क्षेत्र तेवढेच आहे. त्यामुळे दाट वस्तीचे गाव म्हणूनही या गावाची तालुक्यात ओळख आहे.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकांना स्वतंत्र निवारा आवश्यक आहे. त्यासाठी जागेची निकड सर्वांनाच जाणवू लागली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या पूर स्थितीमुळे गावाला पूर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी आहे. तसेच रेड झोनमधील घरांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज असताना शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.समस्या मार्गी लावणारखासदार राजीव सातव यांनी रविवारी तिवरंग, चिखली, वडद, पोहंडूळ, फुलसावंगी, मलकापूर, चिल्ली, मुडाणा परिसराचा भर पावसात दौरा करून तिवरंग येथील पूरसंरक्षक भिंत व पुनर्वसनाची मागणी मार्गी लावण्याची ग्वाही बालूसिंग जाधव, मधुकर जगन राठोड, सीमा जाधव यांना दिली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, किशोर भवरे, शिवाजी देशमुख सवनेकर, गजानन कांबळे, प्रेमराव वानखेडे, नारायण घुमनर, स्वप्नील नाईक, डॉ.अरुण पाटील, शैलेश कोपरकर उपस्थित होते.