शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

तिवरंगच्या पुनर्वसनाची मागणी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:37 IST

तालुक्यातील तिवरंग येथील पूर संरक्षक भिंत, पुनर्वसनाची मागणी गेल्या २० वर्षांपासून धूळखात पडून आहे. रविवारी खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट देऊन ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देखासदारांची भेट : भरपावसात तालुक्यात दौरा, ग्रामस्थांकडून पुनर्वसनासाठी साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील तिवरंग येथील पूर संरक्षक भिंत, पुनर्वसनाची मागणी गेल्या २० वर्षांपासून धूळखात पडून आहे. रविवारी खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट देऊन ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.तिवरंग येथील नाला काठावरील ८६ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी २००५ पासून धूळखात पडून आहे. पूर आल्यानंतर तेवढ्यापुरती धावपळ करायची आणि पूर ओसरला की सर्व विसरून जायचे, असा प्रकार सुरू आहे. तेथे नाल्याच्या काठावर किमान १०० कुटुंबे कसेबसे वास्तव्य करीत आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ८०० च्या घरात आहे. लोकसंख्या वाढत असताना भौगोलिक क्षेत्र तेवढेच आहे. त्यामुळे दाट वस्तीचे गाव म्हणूनही या गावाची तालुक्यात ओळख आहे.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकांना स्वतंत्र निवारा आवश्यक आहे. त्यासाठी जागेची निकड सर्वांनाच जाणवू लागली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या पूर स्थितीमुळे गावाला पूर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी आहे. तसेच रेड झोनमधील घरांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज असताना शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.समस्या मार्गी लावणारखासदार राजीव सातव यांनी रविवारी तिवरंग, चिखली, वडद, पोहंडूळ, फुलसावंगी, मलकापूर, चिल्ली, मुडाणा परिसराचा भर पावसात दौरा करून तिवरंग येथील पूरसंरक्षक भिंत व पुनर्वसनाची मागणी मार्गी लावण्याची ग्वाही बालूसिंग जाधव, मधुकर जगन राठोड, सीमा जाधव यांना दिली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, किशोर भवरे, शिवाजी देशमुख सवनेकर, गजानन कांबळे, प्रेमराव वानखेडे, नारायण घुमनर, स्वप्नील नाईक, डॉ.अरुण पाटील, शैलेश कोपरकर उपस्थित होते.