सहा माती नाल्यांचे निकृष्ट बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:15 IST2018-05-29T22:14:47+5:302018-05-29T22:15:29+5:30

शासनाच्या कृषी विभागामार्फत पुसद तालुक्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे सुरू असून ती निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार माळआसोली गावात पुढे आला आहे.

Deficit construction of six soil drains | सहा माती नाल्यांचे निकृष्ट बांधकाम

सहा माती नाल्यांचे निकृष्ट बांधकाम

ठळक मुद्देकृषी खात्याचे जलयुक्त शिवार : पुसद तालुक्यातील कामे पांढरकवड्याच्या कंत्राटदाराला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या कृषी विभागामार्फत पुसद तालुक्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे सुरू असून ती निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार माळआसोली गावात पुढे आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांतर्गत पुसद तालुका कृषी अधिकाऱ्याच्या देखरेखीत जलयुक्त शिवारची कामे सुरू आहेत. माळआसोली गावात सहा माती नालाबांध व शेततळ्याच्या कामाची २५ लाखांची एकत्र निविदा काढली गेली. पांढरकवड्यातील पवन नामक व्यक्तीने २५ टक्के कमी दराने हा कंत्राट मिळविला. मात्र प्रत्यक्षात अवघ्या पाच ते सहा लाखात थातूरमातूर पद्धतीने बंधाºयाची ही कामे उरकली जात आहे. हार्डरॉकचे ब्लास्टिंग करून काळीमाती भरणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ब्लास्टिंग केलेच गेले नाही. शिवाय मातीही भरली गेली नाही. बोल्डर मुरुम मिश्रीत माती टाकली गेली. या कामावर दोन पोकलॅन्ड असून अवघ्या चार ते पाच दिवसात बंधारा तयार केला जात आहे. या संपूर्ण कामात ३० टक्के मार्जीन असून त्यात कृषी विभागातील काही अधिकारी ‘वाटेकरी’ असल्याचे बोलले जाते. अवघ्या तीन दिवसात बंधाºयाची ही कामे पूर्ण केली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अतिशय निकृष्ट पद्धतीने ही कामे होत असताना पुसद तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, त्यांचे सहायक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
कृषी अधिकाऱ्यांकडून सारवासारव
दरम्यान माळआसोलीच्या कामाबाबत जनतेतून ओरड होताच कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन ते काही काळ बंद ठेवले. निकषानुसार काम करून घेणार असल्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. मात्र जिल्ह्यात जलयुक्त शिवारची बहुतांश कामे अशाच पद्धतीने केली जात आहे. यापूर्वी गेल्या काही वर्षात झालेल्या व सध्या सुरू असलेल्या संपूर्ण कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात एकाच कंत्राटदाराची पाच ते सहा कोटींची कामे
पांढरकवड्याच्या या कंत्राटदाराने जलयुक्त शिवारची जिल्ह्यात पाच ते सहा कोटींची ८० टक्के कामे स्वत:कडे मिळविली आहे. ‘पवन’ गतीने ही कामे पूर्ण करून देयके काढली जात आहे. या संपूर्ण कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास जलयुक्त शिवारमध्ये शासनाचा निधी नेमका कुठे मुरला हे उघड होण्यास वेळ लागणार नाही. मर्जीतील कंत्राटदारांना कामे देता यावी, यासाठीच जलयुक्तच्या निविदांमध्ये मालकीच्या पोकलॅन्ड, जेसीबी, टँकर या सारख्या यंत्रांची अट घालण्यात आली. माळआसोलीचे हे काम त्यातीलच असल्याचे सांगण्यात येते.
उन्हाळ्यात कामे, पावसाळ्यात रेकॉर्ड
उन्हाळ्यात जलयुक्त शिवारची कामे करायची व पावसाळा झाल्यानंतर या कामाचे रेकॉर्ड तयार करायचे असा कृषी विभागाचा फंडा आहे. माळआसोली हे गाव ड्रायझोनमध्ये आहे. जलयुक्त शिवारमध्ये त्याचा समाविष्ट करण्यासाठी दोन ते तीन वर्ष पाहणीची प्रक्रिया करावी लागते. मात्र या गावात बांधले गेलेले बंधारे हे मनुष्यच नव्हे तर जनावरांच्याही उपयोगी पडणार नसल्याचे सांगितले जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामावर प्रत्यक्ष भेटी दिल्यास त्यातील घोळ उघड होईल. एकीकडे पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेद्वारे पाणी बचतीचे धडे देत असताना कृषी विभाग मात्र जलयुक्त शिवारच्या कामाचे तीनतेरा वाजवित आहे.

Web Title: Deficit construction of six soil drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.