शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अनुकंपा नोकरी न देणे म्हणजे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:00 IST

अनुकंपा वारसांना वर्षानुवर्षे प्रतीक्षेत ठेवणे म्हणजे शासनाच्या मुळ हेतूलाच हरताळ फासण्यासारखे आहे, अशा शब्दात मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

ठळक मुद्दे‘मॅट’चे जलसंपदा प्रशासनावर ताशेरे युवकाला १६ वर्षानंतर मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाले असेल तर त्याला तत्काळ अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. संकटात आलेल्या अशा परिवाराला तत्काळ आर्थिक सहाय्य करणे हा या मागचा शासनाचा प्रामाणिक हेतू आहे. परंतु नोकरी न देता अनुकंपा वारसांना वर्षानुवर्षे प्रतीक्षेत ठेवणे म्हणजे शासनाच्या मुळ हेतूलाच हरताळ फासण्यासारखे आहे, अशा शब्दात मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.मनोज अशोक दमाले असे यातील याचिकाकर्त्याचे नाव आहे. हे प्रकरण न्या. कुºहेकर यांच्यापुढे सुनावणीला आले. त्यावर २ एप्रिल रोजी निर्णय देताना ‘मॅट’ने नाशिक येथील जलसंपदा अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. पात्र असूनही अनुकंपा नोकरी नाकारणे ही बाब गंभीर व चुकीची आहे

जागा नसेल तर निर्माण करा१९८९ ला सर्वोच्च न्यायालयाने सुषमा गोसेन प्रकरणात निर्णय देताना जागा उपलब्ध नसेल तर ती निर्माण करून अनुकंपा नोकरी द्या, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाकडे ‘मॅट’ने शासनाचे लक्ष वेधले. या प्रकरणात मनोज दमाले या युवकाला १६ वर्षानंतर न्याय दिला. त्याने मुदतीत केलेला अर्ज योग्य समजून त्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट करा व त्याला सर्व लाभ द्या, असे निर्देश देण्यात आले. या प्रकरणात मनोज दमाले यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर तर शासनाच्यावतीने एस.टी. सूर्यवंशी यांनी सादरकर्ता अधिकारी म्हणून काम पाहिले.प्रकरण असे की, अशोक दमाले हे नाशिक येथे जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. २७ एप्रिल २००२ ला त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज दिला. मात्र तुमचे वय ४० पेक्षा अधिक झाले, असे सांगून अर्ज नाकारला गेला. दरम्यान १७ एप्रिल २०१४ ला अशोक यांची पत्नी व मुलगा मनोज यांनी संयुक्त अर्ज दिला. त्यांचा अर्ज मुलाला नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे सांगून २०१६ ला नाकारला गेला. अखेर त्या विरोधात मनोजने ‘मॅट’मध्ये घाव घेतली. अनुकंपा तत्वावरील नोकरी मागणारा अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे हे कायद्याच्या विरोधात असल्याचे ‘मॅट’ने नमूद केले. अखेर १६ वर्षानंतर मनोजला ‘मॅट’मध्ये न्याय मिळाला. त्याच्यावतीने अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर, अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.चुकीवर ठेवले बोटजलसंपदा विभागाने एक तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघितला नसावा, अथवा या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला असावा, अशी शक्यता ‘मॅट’ने वर्तविली. अशा प्रकरणात मनोजकडून वेगळा अर्ज येण्याची अपेक्षा ठेवणे गैर असल्याचेही ‘मॅट’ने म्हटले आहे.

टॅग्स :Governmentसरकार