शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

धरणे तुडुंब; बेंबळा, लोअर वर्धाचे दरवाजे उघडले; अडाण नदीच्या पात्रात तरुण वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:36 IST

मदत वेळेवर न मिळाल्याने ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

यवतमाळ : जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून प्रतिसेकंद ४० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जलसंचय वाढला आहे. सध्या या प्रकल्पात ८१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, लोवर वर्धा प्रकल्पाचेही तीन दरवाजे ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून प्रतिसेकंद ७६.८६ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढला असून बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील चारही प्रमुख प्रकल्पात लक्षणीय पाणीसाठा होता. अरुणावती प्रकल्पात मागील वर्षी ८६.६८ टक्के पाणी होते. यंदा या प्रकल्पात ८४.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बेंबळा प्रकल्पही तुडुंब आहे.

या प्रकल्पात ४५.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर इसापूर प्रकल्पात ६५.४२ टक्के आणि पूस प्रकल्पात ८२.९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील इतर मध्यम व लघु प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा असून मोठा पाऊस झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सेवानिवृत्त शिक्षकाचा अद्यापही पत्ता नाही

अकोला बाजार : गावाजवळून वाहणाऱ्या नदीत वाहून गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचा महिना लोटूनही पत्ता लागलेला नाही. विलास सुखदेव खरतडे (६०, रा. अकोला बाजार) असे त्यांचे नाव आहे. त्यांची शेती अकोला बाजार येथे नदीकाठावर आहे. २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ते दुचाकीने शेतात गेले होते. नदीला पाणी वाढत असल्याने दुचाकी झाडाला बांधत होते. त्याचवेळी पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. परंतु अजूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही.

बचाव पथकाची नदीपात्रात दिवसभर शोधमोहीम

अकोला बाजार / कुन्हा (तळणी) : सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा होत असताना बोरगाव पुंजी या गावात पूजेसाठी आंघोळ करताना युवक अडाण नदीत वाहून गेला. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश सुभाष राठोड (१८, रा. बोरगाव पुंजी) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

योगेश हा नागपंचमीनिमित्त पूजा करण्यासाठी अडाण नदीकाठावर असलेल्या उत्तरेश्वर शिवमंदिरात दूध व पूजेचे साहित्य सोबत घेऊन गेला होता. तत्पूर्वी तो लगतच्या अडाण नदीत स्नान करण्यासाठी गेला. पाय घसरून पुराच्या प्रवाहात गटांगळ्या खात वाहून गेला. या प्रकाराची माहिती त्याठिकाणी उपस्थितांनी गावात दिली. गावातील काही जणांनी पुरात पोहून योगेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती लगेच प्रशासनाला देण्यात आली. परंतु शोधकार्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यवतमाळहून शोधपथक पोहोचत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला. दुपारी २:३० वाजतापासून शोधकार्य सुरू करण्यात आले. आण येथील तहसीलदार परशुराम भोसले, तलाठी सुनील राठोड, बिट जमादार सुशील शर्मा आदी घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत शोधमोहीम राबविली.

जिल्ह्यात बरसला वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

यावर्षीच्या हंगामामध्ये पावसाने सर्व विक्रम मोडीत काढत मासिक सरासरीच्या ११५ टक्के पावसाची नोंद केली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के आहे. जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरीदेखील ओलांडली आहे. त्यामध्ये आर्णी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १३९ टक्के पाऊस कोसळला आहे तर यवतमाळ तालुक्यात १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नेर, पुसर आणि उमरखेडमध्ये वार्षिक सरासरीच्या उंबरठ्यावर पाऊस ठेपला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसDamधरणYavatmalयवतमाळdrowningपाण्यात बुडणे