शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

ढिगाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.वणी ...

ठळक मुद्देवेकोलिचे आडमुठे धोरण : गावांनाही पडतो पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.वणी परिसरात वेकोलिचा पसारा वाढला आहे. बहुतांश खाणी खुल्या स्वरूपाच्या असून त्यातील अधिक खाणी वर्धा व विदर्भा नदीच्या काठावर आहे. खुल्या खाणीतील कोळसा काढण्यापूर्वी उपसावी लागणारी माती वेकोलिने नियम डावलून टाकली आहे. त्याचे मानवनिर्मीत पर्वत तयार झाले आहेत. नदी नाल्यांचा प्रवाह व पुराचा विस्तार लक्षात न घेता ढिगारे टाकण्यात आले आहे. त्यामुळे या ढिगाऱ्यांना नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी अडून त्याचे बॅकवॉटर शेतांमध्ये प्रवेश करतात.उकणी, बेलोरा, नायगाव, मुंगोली, जुगाद, कोलगाव, साखरा, घोन्सा या गावच्या अनेक शेतांमध्ये गेल्या १५ दिवसात पाणी शिरले. त्यामुळे पिके दोन दिवस पाण्याखाली राहिली. पिके सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे कित्येक गावांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आला की, गावकऱ्यांच्या उरात धडकी भरते. जुगाद, कोलेरा, मुंगोली या गावांना पुराचा वेढा पडतो. वेकोलिने या गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकरी कित्येक वर्षांपासून करीत आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.१०-१२ खाणीपैकी काही खाणी बंद अवस्थेत आहे. तरीही त्याचे ओव्हरबर्डन पर्वत रूपाने व खाण दरी रूपाने कायम आहेत. बंद पडलेल्या खाणी बुजवून पूर्ववत जमीन सपाट केल्यास अनेक धोके टळू शकतात. विदर्भा नदीला नुकताच आलेला पुर घोन्सा खणीचे ओव्हरबर्डन फोडून खाणीत शिरला. त्यामुळे घोन्सा खाण दोनदा पुराच्या पाण्याने डच्च भरली. नदी काठावरील ढिगारे नदीत घसरू लागल्याने काही ठिकाणी वर्धा नदीचे पात्र अरूंद होत आहे. यामुळेही पुराचा विस्तार वाढून शेती पाण्याखाली येत आहे. वेकोलिच्या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध न घातल्यास भविष्यात धोके वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस