शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पाटाळा येथील नवीन पुलाला पडल्या भेगा, वाहनचालकांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:11 IST

स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

वणी (यवतमाळ) : करंजी ते नागभीड-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील वणी येथून वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाला पहिल्याच पुरात भेगा पडल्या आहेत. दोन ठिकाणी पूल एका बाजुने तीन ते चार इंच दबला आहे. त्यामुळे वाहनचालक प्रवास करताना घाबरत आहेत. पुलाखाली पावसाचे व धरणाचे पाणी असल्याने तेथे पुलाला काही धोका निर्माण झाल्यास पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केला आहे.

वणी तालुक्यातून चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी वणी ते वरोरा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग नुकताच तयार झाला आहे. या महामार्गावर जुन्या पाटाळा पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधून नवीन राष्ट्रीय महामार्ग आणखी मजबूत तयार करण्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न पुल नादुरुस्त झाल्याने फसला आहे.

मार्च २०२३ मध्ये पाटाळा येथील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र पुलाचे काम पूर्ण होताच, पुलाच्या आरसीसी बांधकामाला भेगा पडण्यास सुरूवात झाली होती. त्यात सिमेंट बांधकाम करताना तेथे पाण्याचा वापरदेखील केला गेला नाही. मात्र आरसीसी बांधकाम होताना पाण्याचा वापर केला गेला जात नव्हता आणि त्यावेळी मे महिन्यातील कडक उन्हं होते. त्यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलाच्या सर्व भागात भेगा पाडण्यास सुरूवात झाली होती. त्यातच शुक्रवारी पुल काही ठिकाणी दोन ते तीन इंच दबलेला आढळला. दरम्यान, ही बाब लक्षात येताच, कंत्राटदाराने ताबडतोब चुरी आणून ते लेव्हल केले व पुलाला पडलेल्या भेगासुद्धा बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र कायम अवजड वाहनांची वाहतूक होणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची स्थिती अवजड वाहनांची वाहतूक झेपणारी आहे काय? असा प्रश्न या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना भेडसावत आहे.

पुलाला कोणताही धोका नाही

पाटाळा गावापासून वणीकडे येताना बनविलेल्या पुलाचे काम हे चांगल्या दर्जाचे झाले आहे. मी आताच पाहणी करून आलो. अॅप्रोचमध्ये इश्यू आला आहे. सेच्युरेशनमुळे हा प्रकार झाला आहे. पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही - अभिजीत जिचकार, वरिष्ठ अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

पुणे, मुंबईकडे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेत हा मार्ग अरूंद आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे काय? असा प्रश्न पडतो. त्यात या रस्त्यावर बनवले जाणारे नवीन पूल ही आमच्यासारख्या सातत्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. या पुलाच्या कामाचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. 

- दिनेश भोईर, ग्रामस्थ-पाटाळा

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर