शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पाटाळा येथील नवीन पुलाला पडल्या भेगा, वाहनचालकांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:11 IST

स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

वणी (यवतमाळ) : करंजी ते नागभीड-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील वणी येथून वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाला पहिल्याच पुरात भेगा पडल्या आहेत. दोन ठिकाणी पूल एका बाजुने तीन ते चार इंच दबला आहे. त्यामुळे वाहनचालक प्रवास करताना घाबरत आहेत. पुलाखाली पावसाचे व धरणाचे पाणी असल्याने तेथे पुलाला काही धोका निर्माण झाल्यास पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केला आहे.

वणी तालुक्यातून चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी वणी ते वरोरा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग नुकताच तयार झाला आहे. या महामार्गावर जुन्या पाटाळा पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधून नवीन राष्ट्रीय महामार्ग आणखी मजबूत तयार करण्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न पुल नादुरुस्त झाल्याने फसला आहे.

मार्च २०२३ मध्ये पाटाळा येथील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र पुलाचे काम पूर्ण होताच, पुलाच्या आरसीसी बांधकामाला भेगा पडण्यास सुरूवात झाली होती. त्यात सिमेंट बांधकाम करताना तेथे पाण्याचा वापरदेखील केला गेला नाही. मात्र आरसीसी बांधकाम होताना पाण्याचा वापर केला गेला जात नव्हता आणि त्यावेळी मे महिन्यातील कडक उन्हं होते. त्यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलाच्या सर्व भागात भेगा पाडण्यास सुरूवात झाली होती. त्यातच शुक्रवारी पुल काही ठिकाणी दोन ते तीन इंच दबलेला आढळला. दरम्यान, ही बाब लक्षात येताच, कंत्राटदाराने ताबडतोब चुरी आणून ते लेव्हल केले व पुलाला पडलेल्या भेगासुद्धा बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र कायम अवजड वाहनांची वाहतूक होणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची स्थिती अवजड वाहनांची वाहतूक झेपणारी आहे काय? असा प्रश्न या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना भेडसावत आहे.

पुलाला कोणताही धोका नाही

पाटाळा गावापासून वणीकडे येताना बनविलेल्या पुलाचे काम हे चांगल्या दर्जाचे झाले आहे. मी आताच पाहणी करून आलो. अॅप्रोचमध्ये इश्यू आला आहे. सेच्युरेशनमुळे हा प्रकार झाला आहे. पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही - अभिजीत जिचकार, वरिष्ठ अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

पुणे, मुंबईकडे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेत हा मार्ग अरूंद आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे काय? असा प्रश्न पडतो. त्यात या रस्त्यावर बनवले जाणारे नवीन पूल ही आमच्यासारख्या सातत्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. या पुलाच्या कामाचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. 

- दिनेश भोईर, ग्रामस्थ-पाटाळा

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर