शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कापसाचे उत्पन्न घटणार

By admin | Updated: October 12, 2014 23:38 IST

वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़

लाल्या रोगाची लागण : कापसाला हवा सहा हजार रूपये भाववणी : वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़ त्यामुळे केंद्र शासनाने कापसाच्या हमी भावामध्ये भरीव वाढ करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे़वणी क्षेत्रातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ मात्र यावर्षी पावसाळ्यात पाऊस अपुरा पडला़ त्यामुळे पिकांची वाढ खुंटली़ आता तर महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतांना भेगा पडल्या आहेत़ त्यामुळे कोरडवाहू पिके संकटात सापडली आहे़ वणी क्षेत्रात कापूस, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके घेतली जातात़ त्यात सोयाबीन पीक काढणीच्या वाटेवर आहेत़ सोयाबिनचेही उत्पादन समाधानकारक नाहीत, असे शेतकरी सांगत आहे़ कापूस पीक तर शेतकऱ्यांच्या आर्थिक घडीचा मोठा आधार असते़ मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने कपाशीची झाडे वाढलीच नाहीत़ झाडांना अपेक्षेप्रमाणे फळ धारणाही झाली नाही़ एवढेच नव्हे तर आता झाडांवर लाल्या रोगांचे आक्रमण होऊ लागले आहे़ त्यामुळे कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यास साथ देईल की नाही, याविषयी शेतकरी साशंक आहेत़ दिवाळी जवळ आली, तरी अजून कापसाचे बोंड शेतकऱ्यांच्या घरी आले नाही़ त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे़ सहकारी संस्थांचे व बँकाचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी यावर्षी शेती केली आहे़ जर उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही, तर कर्ज कसे फेडावे, पुढील वर्षाचा संसाराचा गाडा कसा ओढावा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे़ पाऊस नसल्याने तुरीच्या उत्पादनाचीही आशा राहिली नाही़ रबी पिकांची तर आशाच मावळली आहे़ ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, असे १० टक्के शेतकरी रबी पिकांची पेरणी करू शकतील़ ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतीतून सोयाबीन पीक निघाल्यानंतर जमिनी पडूनच राहण्याची चिन्हे आहेत़ शासनाने कापूस पिकांचे उत्पादन कमी झाल्यामुळे कापसाला किमान सहा हजार रूपये हमी भाव द्यावा, अशी अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)