शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयच्या केंद्रांवर आजपासून कापूस खरेदी; तांत्रिक अडचणीमुळे ठप्प होती उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:01 IST

बाजार समितीत पत्र धडकले : १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीसीआयच्या १५ केंद्रांवर ११ फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले होते. १४ दिवसानंतर सोमवार, २४ फेब्रुवारीपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. याबाबतचे पत्र बाजार समितीत धडकले आहे.

यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे २५ लाख क्विंटल कापूस खरेदी - विक्रीची उलाढाल होते. यावर्षी सीसीआयने झरीवगळता सर्व १५ तालुक्यात कापूस खरेदी केंद्र उघडले. ११ फेब्रुवारीपूर्वी या केंद्रांवर १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापसाची आवक वाढत असताना सीसीआयने खरेदीला ब्रेक लावला तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी केली जाणार नाही, असे जाहीर केले.

जिल्ह्यात पूर्वी सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत होती. तसेच खासगी बाजारातही व्यापारी कापूस खरेदी करायचे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पर्याय होते. परंतु, पणन महासंघाची यंदाही केंद्र शासनाने सब एजंट म्हणून नियुक्ती केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशा स्थितीत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून १४ दिवसांपासून कापूस खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, सीसीआयने सोमवारपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हानअजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे.

१४ दिवसांत मोठी उलाढालसीसीआयने तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून कापूस खरेदी केंद्रे बंद केली. अशावेळी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता. गत १४ दिवसांत खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी - विक्रीतून मोठी उलाढाल केल्याचे ऐकायला मिळत आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही झाली आहे. मात्र, प्रशासनाचे व्यापाऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. 

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हानअजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे. 

टॅग्स :cottonकापूसYavatmalयवतमाळ