शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सीसीआयच्या केंद्रांवर आजपासून कापूस खरेदी; तांत्रिक अडचणीमुळे ठप्प होती उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:01 IST

बाजार समितीत पत्र धडकले : १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीसीआयच्या १५ केंद्रांवर ११ फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले होते. १४ दिवसानंतर सोमवार, २४ फेब्रुवारीपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. याबाबतचे पत्र बाजार समितीत धडकले आहे.

यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे २५ लाख क्विंटल कापूस खरेदी - विक्रीची उलाढाल होते. यावर्षी सीसीआयने झरीवगळता सर्व १५ तालुक्यात कापूस खरेदी केंद्र उघडले. ११ फेब्रुवारीपूर्वी या केंद्रांवर १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापसाची आवक वाढत असताना सीसीआयने खरेदीला ब्रेक लावला तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी केली जाणार नाही, असे जाहीर केले.

जिल्ह्यात पूर्वी सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत होती. तसेच खासगी बाजारातही व्यापारी कापूस खरेदी करायचे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पर्याय होते. परंतु, पणन महासंघाची यंदाही केंद्र शासनाने सब एजंट म्हणून नियुक्ती केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशा स्थितीत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून १४ दिवसांपासून कापूस खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, सीसीआयने सोमवारपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हानअजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे.

१४ दिवसांत मोठी उलाढालसीसीआयने तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून कापूस खरेदी केंद्रे बंद केली. अशावेळी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता. गत १४ दिवसांत खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी - विक्रीतून मोठी उलाढाल केल्याचे ऐकायला मिळत आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही झाली आहे. मात्र, प्रशासनाचे व्यापाऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. 

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हानअजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे. 

टॅग्स :cottonकापूसYavatmalयवतमाळ