शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीसीआयच्या केंद्रांवर आजपासून कापूस खरेदी; तांत्रिक अडचणीमुळे ठप्प होती उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:01 IST

बाजार समितीत पत्र धडकले : १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीसीआयच्या १५ केंद्रांवर ११ फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले होते. १४ दिवसानंतर सोमवार, २४ फेब्रुवारीपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. याबाबतचे पत्र बाजार समितीत धडकले आहे.

यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे २५ लाख क्विंटल कापूस खरेदी - विक्रीची उलाढाल होते. यावर्षी सीसीआयने झरीवगळता सर्व १५ तालुक्यात कापूस खरेदी केंद्र उघडले. ११ फेब्रुवारीपूर्वी या केंद्रांवर १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापसाची आवक वाढत असताना सीसीआयने खरेदीला ब्रेक लावला तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी केली जाणार नाही, असे जाहीर केले.

जिल्ह्यात पूर्वी सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत होती. तसेच खासगी बाजारातही व्यापारी कापूस खरेदी करायचे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पर्याय होते. परंतु, पणन महासंघाची यंदाही केंद्र शासनाने सब एजंट म्हणून नियुक्ती केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशा स्थितीत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून १४ दिवसांपासून कापूस खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, सीसीआयने सोमवारपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हानअजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे.

१४ दिवसांत मोठी उलाढालसीसीआयने तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून कापूस खरेदी केंद्रे बंद केली. अशावेळी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता. गत १४ दिवसांत खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी - विक्रीतून मोठी उलाढाल केल्याचे ऐकायला मिळत आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही झाली आहे. मात्र, प्रशासनाचे व्यापाऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. 

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे यंत्रणेपुढे असणार आव्हानअजूनही पाच ते सहा लाख क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. केंद्र सुरू होताच शेतकरी कापूस विक्रीसाठी गर्दी करणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे. 

टॅग्स :cottonकापूसYavatmalयवतमाळ