शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

लग्नांच्या सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

ठळक मुद्देसोयरिक जुळवाजुळव वाढली

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले अनेक दिवस कोरोना व लाॅकडाऊनमुळे विवाह सोहळे थांबले होते. मात्र आता अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आणि लग्नाचे मुहूर्तही भरपूर आलेत. त्यामुळे विवाह सोहळे वाढत आहेत. पण कोरोनाची धास्ती कायम असल्याने प्रशासनाने नियमावली कायम ठेवली आहे. त्यामुळे दिवाळीपासून सुरू होणाऱ्या लग्नांच्या धुमधडाक्याला कोरोनेचा अडसर कायम आहे.शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

मंगल कार्यालयांना बुकींगची प्रतीक्षादिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे आणि लाॅकडाऊनही शिथिल झाले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये पटापट बुकींग होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही बुकींग होत नसल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. शासनाने उपस्थितीवरील मर्यादा हटविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

हाॅटेलमध्ये मर्यादित ‘पॅकेज’सध्या लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे. मात्र लग्नातील उपस्थितीवर मर्यादा कायम आहे. त्यामुळे कमी पाहुण्यांसाठी भलेमोठे मंगल कार्यालय बुक करण्यापेक्षा लोक टुमदार हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. तेथे छोट्या उपस्थितीकरिता विशेष ‘पॅकेज’ दिले जात आहे. हाॅटेलमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना ‘ईव्हेन्ट’चे स्वरूप दिले जात असल्याने प्रशासनाकडूनही कडक कारवाई होताना दिसत नाही.  

बुकींगला काही रिस्पाॅन्स नाही. कारण शासन कधी निर्णय बदलवेल, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. शासनाने लग्न समारंभात किमान २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली पाहिजे. - मालीराम शर्मा,         संचालक, हरितपाल मंगलम 

लग्नाचे बुकींग नसल्याने मेन्टनन्सचा खर्चही निघत नाही. शासनाने नियमच भरपूर लावून ठेवले आहेत. त्यामुळे लोक हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. लग्नसमारंभात परवानगीपेक्षा जादा लोक येतात. त्यांना कोण रोखणार? रोखल्यास भांडणे होतात.               - प्रमोद तातेड,         संचालक, नवजीवन मंगलम

 

टॅग्स :marriageलग्नCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या