शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

लग्नांच्या सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

ठळक मुद्देसोयरिक जुळवाजुळव वाढली

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले अनेक दिवस कोरोना व लाॅकडाऊनमुळे विवाह सोहळे थांबले होते. मात्र आता अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आणि लग्नाचे मुहूर्तही भरपूर आलेत. त्यामुळे विवाह सोहळे वाढत आहेत. पण कोरोनाची धास्ती कायम असल्याने प्रशासनाने नियमावली कायम ठेवली आहे. त्यामुळे दिवाळीपासून सुरू होणाऱ्या लग्नांच्या धुमधडाक्याला कोरोनेचा अडसर कायम आहे.शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

मंगल कार्यालयांना बुकींगची प्रतीक्षादिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे आणि लाॅकडाऊनही शिथिल झाले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये पटापट बुकींग होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही बुकींग होत नसल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. शासनाने उपस्थितीवरील मर्यादा हटविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

हाॅटेलमध्ये मर्यादित ‘पॅकेज’सध्या लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे. मात्र लग्नातील उपस्थितीवर मर्यादा कायम आहे. त्यामुळे कमी पाहुण्यांसाठी भलेमोठे मंगल कार्यालय बुक करण्यापेक्षा लोक टुमदार हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. तेथे छोट्या उपस्थितीकरिता विशेष ‘पॅकेज’ दिले जात आहे. हाॅटेलमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना ‘ईव्हेन्ट’चे स्वरूप दिले जात असल्याने प्रशासनाकडूनही कडक कारवाई होताना दिसत नाही.  

बुकींगला काही रिस्पाॅन्स नाही. कारण शासन कधी निर्णय बदलवेल, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. शासनाने लग्न समारंभात किमान २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली पाहिजे. - मालीराम शर्मा,         संचालक, हरितपाल मंगलम 

लग्नाचे बुकींग नसल्याने मेन्टनन्सचा खर्चही निघत नाही. शासनाने नियमच भरपूर लावून ठेवले आहेत. त्यामुळे लोक हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. लग्नसमारंभात परवानगीपेक्षा जादा लोक येतात. त्यांना कोण रोखणार? रोखल्यास भांडणे होतात.               - प्रमोद तातेड,         संचालक, नवजीवन मंगलम

 

टॅग्स :marriageलग्नCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या