शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांत समन्वय ठेवा

By admin | Updated: December 7, 2015 06:10 IST

जलयुक्त शिवार अभियान अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. हे अभियान जिल्ह्यात राबविताना संबंधित

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. हे अभियान जिल्ह्यात राबविताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून कामे करणे आवश्यक आहे. नियोजनाप्रमाणे कामे करून मार्च अखेरपूर्वी प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार मनोहर नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, अभियान समितीचे तज्ज्ञ सदस्य प्रकाश जानकर, प्रवीण पांडे, राजू देशमुख आदी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात अभियान प्रचंड यशस्वी झाल्याने अनेक गावांकडून अभियान राबविण्याची मागणी होत आहे. सदर अभियान अतिशय उपयुक्त आहे. अभियानातील विविध यंत्रणांनी काम करत असतांना आपसात समन्वय ठेवला पाहिजे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. एकाच गावात एका बंधाऱ्यावर सलग चार-पाच बंधारे घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दृष्टीस पडू शकते. त्यामुळे एक-दोन बंधारे न घेता किमान सलग पाच-सहा बंधारे घेण्यात यावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१३ गावांची निवड करण्यात आली. प्रत्यक्षात ३०२ गावांमध्ये कामे होऊ शकली. उर्वरित सर्वच गावांमध्ये मार्चपूर्वी कामे होणे आवश्यक आहे. या गावांमधील प्रस्तावित कामाचे आराखडे तयार करून त्या कामांना तातडीने सुरुवात करावी. शासनाने अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढेही अभियानास निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निधीची काळजी न करता यंत्रणेतील सर्वची विभागाने आपसात समन्वय ठेवण्यासोबतच पूर्ण क्षमतेने कामे करावी. मार्च पूर्वी सर्व ४१३ गावांमध्ये चांगल्याप्रकारे कामे होऊन सर्व निधी खर्ची पडला पाहिजे, असे ते म्हणाले. कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी कामे वाढवून दिल्यास कामे गुणवत्तापूर्वक होईल. जलसंपदा विभागासह अन्य विभागाने कामे वाटून देण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०२ कामे झाली असून कामांची संख्या २५२३ इतकी आहे. तर १६७ कामे प्रगती पथावर आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी कामांची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)