शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जलयुक्तच्या कामांत समन्वय ठेवा

By admin | Updated: December 7, 2015 06:10 IST

जलयुक्त शिवार अभियान अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. हे अभियान जिल्ह्यात राबविताना संबंधित

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. हे अभियान जिल्ह्यात राबविताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून कामे करणे आवश्यक आहे. नियोजनाप्रमाणे कामे करून मार्च अखेरपूर्वी प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार मनोहर नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, अभियान समितीचे तज्ज्ञ सदस्य प्रकाश जानकर, प्रवीण पांडे, राजू देशमुख आदी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात अभियान प्रचंड यशस्वी झाल्याने अनेक गावांकडून अभियान राबविण्याची मागणी होत आहे. सदर अभियान अतिशय उपयुक्त आहे. अभियानातील विविध यंत्रणांनी काम करत असतांना आपसात समन्वय ठेवला पाहिजे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. एकाच गावात एका बंधाऱ्यावर सलग चार-पाच बंधारे घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दृष्टीस पडू शकते. त्यामुळे एक-दोन बंधारे न घेता किमान सलग पाच-सहा बंधारे घेण्यात यावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१३ गावांची निवड करण्यात आली. प्रत्यक्षात ३०२ गावांमध्ये कामे होऊ शकली. उर्वरित सर्वच गावांमध्ये मार्चपूर्वी कामे होणे आवश्यक आहे. या गावांमधील प्रस्तावित कामाचे आराखडे तयार करून त्या कामांना तातडीने सुरुवात करावी. शासनाने अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढेही अभियानास निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निधीची काळजी न करता यंत्रणेतील सर्वची विभागाने आपसात समन्वय ठेवण्यासोबतच पूर्ण क्षमतेने कामे करावी. मार्च पूर्वी सर्व ४१३ गावांमध्ये चांगल्याप्रकारे कामे होऊन सर्व निधी खर्ची पडला पाहिजे, असे ते म्हणाले. कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी कामे वाढवून दिल्यास कामे गुणवत्तापूर्वक होईल. जलसंपदा विभागासह अन्य विभागाने कामे वाटून देण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०२ कामे झाली असून कामांची संख्या २५२३ इतकी आहे. तर १६७ कामे प्रगती पथावर आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी कामांची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)