‘वायपीएस’मध्ये संभाषण स्पर्धा
By Admin | Updated: August 12, 2015 03:15 IST2015-08-12T03:15:55+5:302015-08-12T03:15:55+5:30
विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीने येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये संभाषण स्पर्धा घेण्यात

‘वायपीएस’मध्ये संभाषण स्पर्धा
यवतमाळ : विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीने येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये संभाषण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘वायपीएस’मध्ये चार सदन आहेत. प्रत्येक सदनातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्यातील संभाषण कौशल्य सादर केले. निवडणूक प्रक्रिया, भ्रष्टाचार, सायबर क्राईम आदी विषय यासाठी ठेवण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. परीक्षक म्हणून शिक्षिका बॉम्बेवाला, कढव यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘भ्रष्टाचार’ या विषयावर संभाषण करणारी जान्हवी राठी हिने पटकाविला. आमीर सैयद याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सदर दोनही विद्यार्थी विक्रांत सदनाचे आहेत. तृतीय क्रमांक गजराज सदनाची विधी ठाकरे हिने मिळविला. स्पर्धेची रूपरेषा अमोल चन्नूरवार यांनी मांडली. संचालन शर्वरी देशमुख आणि रूचा मार्इंदे यांनी केले. अभिजित भिष्म यांनी मंच सजावट केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)