शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महादीपचा उपक्रम; झेडपी शाळांचे ३७ विद्यार्थी विमानाने जाणार बंगळुरू, म्हैसूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 15:28 IST

हा अभूतपूर्व सोहळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विमानाने प्रथमच प्रवास करणार आहेत आणि विविध ठिकाणांची माहिती घेणार आहेत.

ठळक मुद्देदिव्यांग विद्यार्थ्यांनाही मिळाली संधी

यवतमाळ : स्पर्धा परीक्षेच्या युगात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेने महादीप हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात टॉप ठरलेल्या ३७ विद्यार्थ्यांना विमानाने बंगळुरू आणि म्हैसूरचा प्रवास घडणार आहे. गुरुवारी (दि. २८) हे विद्यार्थी प्रवासाला निघणार आहेत.

जिल्हा परिषदेने महादीप हा उपक्रम पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभर राबविला होता. यामध्ये शाळास्तर, केंद्रस्तर, तालुका आणि सरते शेवटी जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एमपीएससी, यूपीएससीच्या तोडीची होती. या परीक्षेत टॉप ठरलेल्या ४२ विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास घडविला जाणार होता. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या अडचणी आल्यामुळे आता ३७ विद्यार्थी विमानाने बंगळुरू आणि म्हैसूरला जाणार आहेत.

यामध्ये चार विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. याशिवाय एका दिव्यांग विद्यार्थ्याचाही त्यात समावेश आहे. गुणवत्तेच्या निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रवास घडवून आणला जात आहे. बंगळुरूमध्ये प्राणी संग्रहालय आणि म्हैसूरमध्ये वृंदावन गार्डन यासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल घडविली जात आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी आणि मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासह स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा हा मुख्य उद्देश महादीपचा होता. यातूनच ही सहल आता राज्याबाहेर जात आहे.

२८ एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभागृहातून जिल्हाधिकारी अमोल येडगे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर प्रवासासाठी निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे. नागपूरमधून हे विद्यार्थी विमानाने थेट बंगळुरूला पोहोचणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. दोन दिवसांमध्ये विविध ठिकाणी भेटीही देणार आहेत. तर दोन दिवस म्हैसूरसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षक असणार आहेत. एका शिक्षकाकडे सहा विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्याचे पालक सोबत असणार आहेत. हा अभूतपूर्व सोहळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी विमानाने प्रथमच प्रवास करणार आहेत आणि विविध ठिकाणांची माहिती घेणार आहेत.

महादीप घडविणार इतिहास

शासकीय शाळांमधील विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे पडू नये म्हणून शिक्षण विभागाने महादीप उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात सर्वाधिक टॉप गुणांकन मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विमानवारी घडणार आहे. हा जिल्हा परिषद शाळेचा इतिहास असणार आहे.

महादीप उपक्रमाला दारव्हा येथून सुरुवात झाली. या उपक्रमाला मिळणारे यश पाहता, त्याची अंमलबजावणी जिल्हाभरात केली जात आहे. यासाठी विशेष पुस्तकांची निर्मिती करण्यात आली. हे पुस्तक सर्वांसाठीच उपयोगी आहे. या परीक्षेत टॉप करणारे विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले आहेत.

- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी