शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे झाले आहे. अशाही स्थितीत शासनाने हमी भावाचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. दरवर्षी पणन महासंघाकडून दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी सुरू केली जाते. मात्र यावर्षी तो मुहूर्त निघालाच नाही. आता तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी शनिवारी कळंब तहसील कार्यालयात धडक दिली.शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर स्थितीत किमान हमी भावाने कापूस खरेदी सुरू करणे अपेक्षित आहे. विनाअट क्विंटलमागे एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती बालू पाटील दरणे, संचालक चंद्रशेखर चांदोरे, आनंदराव जगताप, सुदाम पवार, माजी सभापती शशीकांत देशमुख, सुरेश चिंचोळकर, पंडित चावरे, घनश्याम दरणे, अरुणा चांदोरे, दीपक कदम, मुश्ताक शेख, अशोक उमरतकर, शालीक भुजाडे, राजेश भोयर, सिद्धेश्वर वाघमारे, प्रवीण खडसे, पुरुषोत्तम आगलावे, महादेव कोरवते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस