शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 03:09 IST

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते.

यवतमाळ : सलग ४० वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्यापुढे आता पक्षातीलच नवतरुणांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या तिकिटासाठी मुंबई-दिल्लीपर्यंत संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते. गेल्या पाच वर्षात त्यांनी जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. भाजप व सेनेची साथ घेतली म्हणून त्यांना थेट पक्ष श्रेष्ठींच्या टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र त्यांनी सत्तेचा हट्ट सोडला नाही. त्यासाठी वेळप्रसंगी पक्ष श्रेष्ठींचा आदेशही धुडकावला. गेल्या पाच वर्षात त्यांनी मुलाचे राजकीय पुनर्वसन करता येते का या दृष्टीनेही चाचपणी केली. त्यासाठी मुलाला मतदारसंघात सक्रिय केले. परंतु सध्या त्यांना पक्षातीलच काही नव्या तरुण चेहऱ्यांनी मतदारसंघातून आव्हान उभे केल्याने त्यांना यावेळी स्वत:च रिंगणात उतरावे लागेल असे दिसते. मतदारसंघातील बिघडलेले सामाजिक समीकरण व त्यातून बहुसंख्य असलेल्या मतदार बांधवांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पक्षाच्या नव्या फिप्टी-फिप्टीच्या धोरणात शिवाजीरावांचे तिकीट कापले गेल्यास ते मुलाचा पत्ता पक्षापुढे फेकतील यात शंका नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मिळालेली ५७ हजार मतांची आघाडी मोघेंसाठी चिंतेची बाब ठरली आहे. मात्र या आघाडीत काँग्रेसचाच छुपा वाटा अधिक असेही बोलले जाते. शिवाजीराव रिंगणात असल्यास भाजपला आर्णीची लढत सोपी नाही एवढे निश्चित. कारण विद्यमान आमदाराविरोधात नाराजी आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होईल.पाच वर्षांत काय घडले?

  • आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात यश.
  • काँग्रेस-राष्टÑवादी व भाजप असे समीकरण जुळवून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे व आपल्या आर्णी मतदारसंघाकडे शिवाजीराव मोघे यांनी खेचून आणले.
  • कुठे भाजप तर कुठे शिवसेनेशी युती करून मोघे यांनी आर्णी नगरपरिषद, पंचायत समितीत सत्ता घेतली.
  • आमदार राजू तोडसाम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांना ५७ हजार मतांची आघाडी मिळवून दिली.
  • आमदार तोडसाम यांच्या कार्यशैलीवर पक्षातूनच अनेक घटक नाराज आहेत. त्यातूनच काही नव्या दमदार चेहऱ्यांनी भाजपच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे.

आमदार म्हणून राजू तोडसाम यांचा परफॉर्मन्स कोणत्याच पैलूने लक्षवेधक ठरत नाही. त्यांनी घाटंजी शहराला एक रुपयाचाही विकास निधी दिला नाही. अशीच स्थिती संपूर्ण मतदारसंघाची राहिली आहे. त्यांनी नेमका कोणता विकास केला हे दाखविण्याचे त्यांना आपण खुले आव्हान देतो. - शैलेश ठाकूर, नगर उपाध्यक्ष (शिवसेना), नगरपरिषद, घाटंजी

टॅग्स :arni-acअर्नीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस