शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 03:09 IST

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते.

यवतमाळ : सलग ४० वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्यापुढे आता पक्षातीलच नवतरुणांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या तिकिटासाठी मुंबई-दिल्लीपर्यंत संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते. गेल्या पाच वर्षात त्यांनी जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. भाजप व सेनेची साथ घेतली म्हणून त्यांना थेट पक्ष श्रेष्ठींच्या टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र त्यांनी सत्तेचा हट्ट सोडला नाही. त्यासाठी वेळप्रसंगी पक्ष श्रेष्ठींचा आदेशही धुडकावला. गेल्या पाच वर्षात त्यांनी मुलाचे राजकीय पुनर्वसन करता येते का या दृष्टीनेही चाचपणी केली. त्यासाठी मुलाला मतदारसंघात सक्रिय केले. परंतु सध्या त्यांना पक्षातीलच काही नव्या तरुण चेहऱ्यांनी मतदारसंघातून आव्हान उभे केल्याने त्यांना यावेळी स्वत:च रिंगणात उतरावे लागेल असे दिसते. मतदारसंघातील बिघडलेले सामाजिक समीकरण व त्यातून बहुसंख्य असलेल्या मतदार बांधवांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पक्षाच्या नव्या फिप्टी-फिप्टीच्या धोरणात शिवाजीरावांचे तिकीट कापले गेल्यास ते मुलाचा पत्ता पक्षापुढे फेकतील यात शंका नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मिळालेली ५७ हजार मतांची आघाडी मोघेंसाठी चिंतेची बाब ठरली आहे. मात्र या आघाडीत काँग्रेसचाच छुपा वाटा अधिक असेही बोलले जाते. शिवाजीराव रिंगणात असल्यास भाजपला आर्णीची लढत सोपी नाही एवढे निश्चित. कारण विद्यमान आमदाराविरोधात नाराजी आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होईल.पाच वर्षांत काय घडले?

  • आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात यश.
  • काँग्रेस-राष्टÑवादी व भाजप असे समीकरण जुळवून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे व आपल्या आर्णी मतदारसंघाकडे शिवाजीराव मोघे यांनी खेचून आणले.
  • कुठे भाजप तर कुठे शिवसेनेशी युती करून मोघे यांनी आर्णी नगरपरिषद, पंचायत समितीत सत्ता घेतली.
  • आमदार राजू तोडसाम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांना ५७ हजार मतांची आघाडी मिळवून दिली.
  • आमदार तोडसाम यांच्या कार्यशैलीवर पक्षातूनच अनेक घटक नाराज आहेत. त्यातूनच काही नव्या दमदार चेहऱ्यांनी भाजपच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे.

आमदार म्हणून राजू तोडसाम यांचा परफॉर्मन्स कोणत्याच पैलूने लक्षवेधक ठरत नाही. त्यांनी घाटंजी शहराला एक रुपयाचाही विकास निधी दिला नाही. अशीच स्थिती संपूर्ण मतदारसंघाची राहिली आहे. त्यांनी नेमका कोणता विकास केला हे दाखविण्याचे त्यांना आपण खुले आव्हान देतो. - शैलेश ठाकूर, नगर उपाध्यक्ष (शिवसेना), नगरपरिषद, घाटंजी

टॅग्स :arni-acअर्नीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस