शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कुणबी मतविभाजनावर काँग्रेसची मदार

By admin | Updated: June 9, 2014 23:50 IST

वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ

राजेश निस्ताने - यवतमाळ वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ बिघडविण्याची व्युहरचना कुणबी नेत्यांनी केली आहे. गेल्या वेळी कासावारांनी शिवसेनेच्या विश्‍वास नांदेकर यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या संजय देरकरांनी बंडखोरी करूनही वामनराव निवडून आले. कारण देरकर यांनी शिवसेनेकडे जाणार्‍या कुणबी मतांमध्ये मोठे भगदाड पाडले होते. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कासावारच राहण्याची शक्यता आहे. दुसर्‍या फळीतील नेते मुलाचे नेतृत्व स्वीकारणार नाही, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पुत्रप्रेमाला आवर घातला असावा. मारेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे यांना काँग्रेसमधील दुसर्‍या फळीची पसंती राहू शकते.  शिवसेनेकडून माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांचे नाव आघाडीवर आहे. वणी शिवसेनेत उपजिल्हा प्रमुखांचा एक गट सक्रिय आहे. या गटाकडून मात्र वेगळेच नाव रेटले जात आहे. राष्ट्रवादीतील नाराज नेते संजय देरकर यांचेही तळ्यात की मळ्यात सुरू आहे. ‘मातोश्री’वरून काही ‘आदेश’ येतो काय, यावर त्यांची पुढील ‘बांधणी’ अवलंबून आहे. तर मुळ शिवसेनेतील कुणालाही उमेदवारी द्या, पण नव्याने पक्षात आलेल्यांना संधी नको, अशी सामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. सेनेतील दुसरा गट मात्र नवख्याला पाठबळ देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वामनराव चटप यांना खुला पाठिंबा देणारे देरकर विधानसभेत ‘आप’च्या आश्रयाला जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून नेहमीप्रमाणे राजू उंबरकर यांचे नाव चर्चेत आहे. दोन कुणबी नेत्यांचे भांडण आणि काँग्रेसचा लाभ अशी वामनराव कासावारांची खेळी राहिली आहे. त्या बळावरच ते चौथ्यांदा निवडून आले. देरकर-नांदेकर भांडत रहावे आणि आपण पुन्हा निवडून यावे, अशीच काँग्रेसची रणनिती आहे. त्यासाठी यावेळीही पडद्यामागून भक्कम ताकद दिली जाईल. ९0 हजारांपेक्षा अधिक कुणबी मतदार येथे आहेत. त्यांच्यात फूट पाडून आपली पोळी  शेकण्याची काँग्रेसची खेळी मतदारांपासून लपून राहिलेली नाही. यावेळी या खेळीला बळी पडायचे नाही, एकजूट होऊन समाजाचे नेतृत्व विधानसभेत पाठवायचे, असा निर्धार कुणबी नेत्यांनी केला आहे. हा निर्धार काँग्रेससाठी मात्र धोक्याची घंटा ठरला आहे.