शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

कुणबी मतविभाजनावर काँग्रेसची मदार

By admin | Updated: June 9, 2014 23:50 IST

वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ

राजेश निस्ताने - यवतमाळ वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ बिघडविण्याची व्युहरचना कुणबी नेत्यांनी केली आहे. गेल्या वेळी कासावारांनी शिवसेनेच्या विश्‍वास नांदेकर यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या संजय देरकरांनी बंडखोरी करूनही वामनराव निवडून आले. कारण देरकर यांनी शिवसेनेकडे जाणार्‍या कुणबी मतांमध्ये मोठे भगदाड पाडले होते. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कासावारच राहण्याची शक्यता आहे. दुसर्‍या फळीतील नेते मुलाचे नेतृत्व स्वीकारणार नाही, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पुत्रप्रेमाला आवर घातला असावा. मारेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे यांना काँग्रेसमधील दुसर्‍या फळीची पसंती राहू शकते.  शिवसेनेकडून माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांचे नाव आघाडीवर आहे. वणी शिवसेनेत उपजिल्हा प्रमुखांचा एक गट सक्रिय आहे. या गटाकडून मात्र वेगळेच नाव रेटले जात आहे. राष्ट्रवादीतील नाराज नेते संजय देरकर यांचेही तळ्यात की मळ्यात सुरू आहे. ‘मातोश्री’वरून काही ‘आदेश’ येतो काय, यावर त्यांची पुढील ‘बांधणी’ अवलंबून आहे. तर मुळ शिवसेनेतील कुणालाही उमेदवारी द्या, पण नव्याने पक्षात आलेल्यांना संधी नको, अशी सामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. सेनेतील दुसरा गट मात्र नवख्याला पाठबळ देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वामनराव चटप यांना खुला पाठिंबा देणारे देरकर विधानसभेत ‘आप’च्या आश्रयाला जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून नेहमीप्रमाणे राजू उंबरकर यांचे नाव चर्चेत आहे. दोन कुणबी नेत्यांचे भांडण आणि काँग्रेसचा लाभ अशी वामनराव कासावारांची खेळी राहिली आहे. त्या बळावरच ते चौथ्यांदा निवडून आले. देरकर-नांदेकर भांडत रहावे आणि आपण पुन्हा निवडून यावे, अशीच काँग्रेसची रणनिती आहे. त्यासाठी यावेळीही पडद्यामागून भक्कम ताकद दिली जाईल. ९0 हजारांपेक्षा अधिक कुणबी मतदार येथे आहेत. त्यांच्यात फूट पाडून आपली पोळी  शेकण्याची काँग्रेसची खेळी मतदारांपासून लपून राहिलेली नाही. यावेळी या खेळीला बळी पडायचे नाही, एकजूट होऊन समाजाचे नेतृत्व विधानसभेत पाठवायचे, असा निर्धार कुणबी नेत्यांनी केला आहे. हा निर्धार काँग्रेससाठी मात्र धोक्याची घंटा ठरला आहे.