शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

राकाँ-भाजपच्या कुबड्या घेऊनही काँग्रेस हरली

By admin | Updated: January 21, 2016 02:16 IST

तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर कित्येक वर्ष वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे.

किशोर वंजारी नेरतालुक्याच्या सहकार क्षेत्रावर कित्येक वर्ष वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या कुबड्या घेऊनही या पक्षाला बहुमत तर दूर जवळपासही पोहोचता आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षाची शक्ती दिसून आली. एवढेच नव्हे तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची या युतीची खेळी फसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रावर काँग्रेसचा दबदबा होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला हा पक्ष जवळही करत नव्हता. आता मात्र काँग्रेसची या पक्षाशी चांगलीच गट्टी जमली आहे. स्वत:ची ताकद कमी पडत असल्याचे पाहून जुळवून घेतले खरे, मात्र त्यातही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याउलट तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसागणिक वाढत आहे. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मिळविलेल्या विजयाने हुरळून जात बाजार समितीसाठीही काँग्रेस-राकाँ-भाजपा एकत्र आली. खविसंच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली गेली. यात त्यांना विजय मिळाला. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठीही हीच रणनीती आखली गेली. मात्र यश आले नाही. केवळ चार जागांवर या युतीला समाधान मानावे लागले. दुसरीकडे शिवसेनेने तब्बल १५ जागा जिंकत सहकार क्षेत्रावर पुन्हा आपला झेंडा रोवला. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तळ ठोकून होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे यांनीही प्रचंड मेहनत घेतली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र यश आले नाही. एकेकाळी काँग्रेसपुढे कुणाचाही थारा लागत नव्हता. माणिकराव ठाकरे यांचा तालुक्याशी संपर्क तुटल्यानंतर काँग्रेस खिळखिळी होत गेली. नगरपालिका, बहुतांश ग्रामपंचायती या पक्षाच्या हातातून गेल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची वाणवा असलेल्या भाजपाशी जुळवून घेत या पक्षाला निवडणूक लढवावी लागत आहे. वास्तविक नेर बाजार समितीत शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. व्यापारी आणि दलाल यांच्यात हातमिळवणी असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागतात. नियोजनाचा अभाव याठिकाणी प्रामुख्याने दिसून येतो. बाजार समितीच्या कार्यप्रणालीला शेतकरी कंटाळले. तरीही त्यांनी काँग्रेसवर विश्वास टाकला नाही. काँग्रेसने या प्रश्नांसाठी कधीही मोर्चे, आंदोलने केली नाही, शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळेच या पक्षाला सत्तेपासून याहीवेळी दूर राहावे लागले. शिवसेनेवर पुन्हा विश्वास दाखवित काँग्रेस-राकाँ-भाजप युतीला बाहेरची वाट दाखविली.