शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

बोगस सोयाबीनच्या नऊ हजारांवर तक्रारी, गुन्हे मात्र दोनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 2:49 PM

अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले.

ठळक मुद्देसर्वाधिक तक्रारी यवतमाळातकंपन्यांची मुजोरी, प्रमुख वितरकांविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष कायम

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाच्या हंगामात उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले. ते पाहता बियाणे कंपन्यांना कृषी विभाग पाठीशी तर घालत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन ४० ते ५० रुपये किलोने विकला. सोयाबीनचे बियाणे मात्र ८० ते ९० रुपये किलो दराने शेतकऱ्यांना खरेदी करावे लागले. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी दाग-दागिना मोडून, उसनवारी करून पैशाची तजवीज केली व नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी केली. परंतु प्रत्यक्षात हे महागडे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक झाली. आता शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. या उलट काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले आणि ते उगवलेसुद्धा. त्यामुळे कंपन्यांच्या बियाण्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

कृषी केंद्रांना हवे पोलीस संरक्षणसोयाबीनचे पेरलेले बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये धडक दिली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागण्याची वेळ आली.

तक्रारींचे ६५ टक्के पंचनामे उरकलेशेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बोगस बियाण्यांबाबत तक्रारींचा सपाटा लावला आहे. अमरावती विभागात गत आठवड्यापर्यंत नऊ हजार ३८० तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. हा आकडा दहा हजारांवर जाणार आहे. त्यातील सर्वाधिक ४ हजार ७४९ तक्रारी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. विभागात या तक्रारींचे ६० टक्के पंचनामे उरकण्यात आले आहे.

कृषिमंत्र्यांचे आदेश, पण गुन्हे नाममात्रबोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीने एक तर शेतकऱ्यांना बियाणे बदलवून द्यावे किंवा दोन दिवसात नुकसानभरपाई द्यावी असे आदेश कृषी मंत्र्यांनी जारी केले होते. जी बियाणे कंपनी या तडजोडीला तयार नसेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले गेले होते.

केवळ बुलडाणा, वाशिममध्ये गुन्हाअमरावती विभागात आतापर्यंत केवळ बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड विरुद्ध तर वाशिम जिल्ह्यात ईगल कंपनीविरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा नोंदविला गेला. नऊ हजार तक्रारी आणि दोनच गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.शेतकऱ्यांना तत्काळ बियाणे बदलवून मिळावे, खरिपाचा हंगाम निघून जावू नये, शेतकºयाचे नुकसान होऊ नये हा प्रयत्न आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवली जावू शकते.- सुभाष नागरेसहसंचालक (कृषी), अमरावती

टॅग्स :agricultureशेती