शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

आचारसंहितेत होतेय चक्क पेट्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र   कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगार कार्यालयाकडून नोंदणीपात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात येतो. जिल्ह्यातील कामगारांना लोखंडी पेटीमध्ये अशा साहित्याचा वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुका असल्याने हे साहित्य वाटप थांबवावे, अशा सूचना  आहेत. यानंतरही कंत्राटदाराने पेटी वाटप  सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे पेटी वाटताना पैसे मागितल्या जात असल्याचा आरोप असून, यासाठी दलालही सक्रिय आहेत. कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र   कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. दोन वर्षांपूर्वी कामगारांना पेट्या वाटप करताना गैरप्रकार झाला होता. यामुळे कंत्राटदाराने हे केंद्रच शहराबाहेर हलविले आहे. आता येथेही  दलालामार्फत पैसे मागितले जात असल्याचा आरोप मजूर करीत आहेत. मुळात ही पेटी योजनेमधून मोफत दिल्या जाते. मात्र  मजुरांकडूनच पैसे उकळले जात आहे. पेटी मिळविण्यासाठी मजुरांचे जथ्थे विशेष वाहनाने शहराकडे येत आहेत.   आचारसंहितेत पेटी वाटप करणे हा गुन्हा आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे या काळात पेटी वाटप करताना आचारसंहितेचा भंग करू नका असे पत्र जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. मात्र यानंतरही मंगळवारी लोहारातील केंद्रावरून पेटीचे वाटप करण्यात आले. यामुळे आचारसंहितेचा आदेश पायदळी तुडविल्याचे चित्र आहे. 

कामगार विभाग कारवाई करेल काय ?

- पेटी वाटपाची जबाबदारी ज्या कंत्राटदारांकडे आहे, त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे.  पैसे मागणीचाही आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची सर्व जबाबदारी कामगार विभागावर  आली आहे. या प्रकरणात कामगार विभाग आता काय कारवाई करतोयाकडे मजुरांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक  आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांमुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे कामगारांमध्ये वाटप करताना आचारसंहितेच्या नियमांचा भंग होणार नाही, नियमांचे काटेकोर पालन होईल, या संदर्भातील निर्देश सुरक्षा किट वाटप करणाऱ्या कंत्राटदारांना दिले आहे. इतकेच नव्हे तर नियमाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असेही सांगितले आहे.  वाटप होत असल्यास ही बाब गंभीर आहे.                

- चांगदेव काशिदजिल्हा कामगार अधिकारी