शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत होतेय चक्क पेट्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र   कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगार कार्यालयाकडून नोंदणीपात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात येतो. जिल्ह्यातील कामगारांना लोखंडी पेटीमध्ये अशा साहित्याचा वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुका असल्याने हे साहित्य वाटप थांबवावे, अशा सूचना  आहेत. यानंतरही कंत्राटदाराने पेटी वाटप  सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे पेटी वाटताना पैसे मागितल्या जात असल्याचा आरोप असून, यासाठी दलालही सक्रिय आहेत. कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र   कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. दोन वर्षांपूर्वी कामगारांना पेट्या वाटप करताना गैरप्रकार झाला होता. यामुळे कंत्राटदाराने हे केंद्रच शहराबाहेर हलविले आहे. आता येथेही  दलालामार्फत पैसे मागितले जात असल्याचा आरोप मजूर करीत आहेत. मुळात ही पेटी योजनेमधून मोफत दिल्या जाते. मात्र  मजुरांकडूनच पैसे उकळले जात आहे. पेटी मिळविण्यासाठी मजुरांचे जथ्थे विशेष वाहनाने शहराकडे येत आहेत.   आचारसंहितेत पेटी वाटप करणे हा गुन्हा आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे या काळात पेटी वाटप करताना आचारसंहितेचा भंग करू नका असे पत्र जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. मात्र यानंतरही मंगळवारी लोहारातील केंद्रावरून पेटीचे वाटप करण्यात आले. यामुळे आचारसंहितेचा आदेश पायदळी तुडविल्याचे चित्र आहे. 

कामगार विभाग कारवाई करेल काय ?

- पेटी वाटपाची जबाबदारी ज्या कंत्राटदारांकडे आहे, त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे.  पैसे मागणीचाही आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची सर्व जबाबदारी कामगार विभागावर  आली आहे. या प्रकरणात कामगार विभाग आता काय कारवाई करतोयाकडे मजुरांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक  आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांमुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे कामगारांमध्ये वाटप करताना आचारसंहितेच्या नियमांचा भंग होणार नाही, नियमांचे काटेकोर पालन होईल, या संदर्भातील निर्देश सुरक्षा किट वाटप करणाऱ्या कंत्राटदारांना दिले आहे. इतकेच नव्हे तर नियमाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असेही सांगितले आहे.  वाटप होत असल्यास ही बाब गंभीर आहे.                

- चांगदेव काशिदजिल्हा कामगार अधिकारी