शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:08 IST

Yawatmal news कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.

ठळक मुद्देदोन वर्षांत ४५ बालविवाहांची नोंददोन कुटुंबांवर गुन्हे नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.

कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती ढासळली. याच काळात कमी खर्चात लग्नसोहळे पार पडत होते. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेमप्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे; तर काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यांतून पालकांनी आपल्या मुलींचे लग्न उरकून टाकले. कुटुंबातील आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनीही विवाह सोहळे पार पडले आहेत. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने ब्रेक लावला आहे.

 

पटसंख्या कमी झालेली मुली गेल्या कुठे?

नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये एक लाख १० हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६१० विद्यार्थ्यांची हजेरी लागली. यामध्ये गैरहजर मुलींची संख्या फार जास्त आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली कुठे गेल्या याचा प्रश्न शाळांना पडला आहे.

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलींचा विवाह पार पाडला.

यामुळे खंडाळा आणि पंगडी गावामध्ये असा विवाह पार पाडणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले गेले.

 

आर्थिक विवंचना हेच कारण

बालविवाह पार पडण्याच्या मागे विविध बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक विवंचना पुढे आली आहे.

अल्पवयीन मुलींचे प्रेमप्रकरणही पुढे आले आहे. आपली मुलगी पळून जाण्यापेक्षा तिचे लग्न करणे योग्य ठरविले.

 

काही विशिष्ट समाजात अल्पवयीन मुलीचे लग्नसोहळे पार पडतात. आर्थिक विवंचना आणि निरक्षरता बालविवाह करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. स्थलांतरित कुटुंबामध्ये अशा प्रकारचे विवाह सोहळे दिसून येतात.

- सुनील भेले, सामाजिक कार्यकर्ता

गत दोन वर्षांमध्ये ४५ बालविवाह पुढे आले आहे. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने आळा घातला आहे. यापूर्वी असे प्रकार फारसे घडले नाहीत. गावपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन केल्या जात आहेत.

- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी