शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:08 IST

Yawatmal news कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.

ठळक मुद्देदोन वर्षांत ४५ बालविवाहांची नोंददोन कुटुंबांवर गुन्हे नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.

कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती ढासळली. याच काळात कमी खर्चात लग्नसोहळे पार पडत होते. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेमप्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे; तर काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यांतून पालकांनी आपल्या मुलींचे लग्न उरकून टाकले. कुटुंबातील आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनीही विवाह सोहळे पार पडले आहेत. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने ब्रेक लावला आहे.

 

पटसंख्या कमी झालेली मुली गेल्या कुठे?

नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये एक लाख १० हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६१० विद्यार्थ्यांची हजेरी लागली. यामध्ये गैरहजर मुलींची संख्या फार जास्त आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली कुठे गेल्या याचा प्रश्न शाळांना पडला आहे.

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलींचा विवाह पार पाडला.

यामुळे खंडाळा आणि पंगडी गावामध्ये असा विवाह पार पाडणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले गेले.

 

आर्थिक विवंचना हेच कारण

बालविवाह पार पडण्याच्या मागे विविध बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक विवंचना पुढे आली आहे.

अल्पवयीन मुलींचे प्रेमप्रकरणही पुढे आले आहे. आपली मुलगी पळून जाण्यापेक्षा तिचे लग्न करणे योग्य ठरविले.

 

काही विशिष्ट समाजात अल्पवयीन मुलीचे लग्नसोहळे पार पडतात. आर्थिक विवंचना आणि निरक्षरता बालविवाह करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. स्थलांतरित कुटुंबामध्ये अशा प्रकारचे विवाह सोहळे दिसून येतात.

- सुनील भेले, सामाजिक कार्यकर्ता

गत दोन वर्षांमध्ये ४५ बालविवाह पुढे आले आहे. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने आळा घातला आहे. यापूर्वी असे प्रकार फारसे घडले नाहीत. गावपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन केल्या जात आहेत.

- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी