शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:08 IST

Yawatmal news कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.

ठळक मुद्देदोन वर्षांत ४५ बालविवाहांची नोंददोन कुटुंबांवर गुन्हे नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.

कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती ढासळली. याच काळात कमी खर्चात लग्नसोहळे पार पडत होते. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेमप्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे; तर काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यांतून पालकांनी आपल्या मुलींचे लग्न उरकून टाकले. कुटुंबातील आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनीही विवाह सोहळे पार पडले आहेत. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने ब्रेक लावला आहे.

 

पटसंख्या कमी झालेली मुली गेल्या कुठे?

नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये एक लाख १० हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६१० विद्यार्थ्यांची हजेरी लागली. यामध्ये गैरहजर मुलींची संख्या फार जास्त आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली कुठे गेल्या याचा प्रश्न शाळांना पडला आहे.

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलींचा विवाह पार पाडला.

यामुळे खंडाळा आणि पंगडी गावामध्ये असा विवाह पार पाडणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले गेले.

 

आर्थिक विवंचना हेच कारण

बालविवाह पार पडण्याच्या मागे विविध बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक विवंचना पुढे आली आहे.

अल्पवयीन मुलींचे प्रेमप्रकरणही पुढे आले आहे. आपली मुलगी पळून जाण्यापेक्षा तिचे लग्न करणे योग्य ठरविले.

 

काही विशिष्ट समाजात अल्पवयीन मुलीचे लग्नसोहळे पार पडतात. आर्थिक विवंचना आणि निरक्षरता बालविवाह करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. स्थलांतरित कुटुंबामध्ये अशा प्रकारचे विवाह सोहळे दिसून येतात.

- सुनील भेले, सामाजिक कार्यकर्ता

गत दोन वर्षांमध्ये ४५ बालविवाह पुढे आले आहे. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने आळा घातला आहे. यापूर्वी असे प्रकार फारसे घडले नाहीत. गावपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन केल्या जात आहेत.

- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी