शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

थर्टी फर्स्टचा जल्लोष आज घरामध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७८१ वर जाऊन पोहोचला होता. अगदी शेजारच्या नागपूर, नांदेड जिल्ह्यांतही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले असल्याने नव्या नवर्षाचे सेलिब्रेशन करताना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी नववर्षाच्या स्वागतासाठी आता घरातच बेत आखावा लागणार आहे. देशभरात ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णात चिंताजनक वाढ होत असल्याने प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे जोखीम न घेता थर्टी फर्स्टचा जल्लोष यंदाही कुटुंबीयांसोबतच साजरा करण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७८१ वर जाऊन पोहोचला होता. अगदी शेजारच्या नागपूर, नांदेड जिल्ह्यांतही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले असल्याने नव्या नवर्षाचे सेलिब्रेशन करताना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्य शासनानेही वाढता धोका लक्षात घेऊन रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री नऊनंतर हॉटेलसह गर्दीच्या ठिकाणी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याऐवजी घरातच कुटुंबीयांसह साधेपणाने ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करावे. पोलीस प्रशासनाने सर्व आस्थापना, रेस्टॉरंट, मॉल्स, विविध दुकाने, तसेच उपगृहामध्ये ग्राहकाने, तसेच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक केलेले आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतर राखून परिसर निर्जंतुकीकरण करणेही बंधनकारक आहे. या नियमांचे व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. 

जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांवर उपचार- जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉन बाधित कोरोना रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यासमोर वाढत्या कोरोनाचा धोका कायम आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजवर ७२ हजार ९७९ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७१ हजार १८५ जणांनी कोरेानावर मात केलेली असून, आजवर या आजारामुळे १७८८ जणांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगून उत्साह साजरा करण्याची आवश्यकता आहे. 

 

टॅग्स :New Yearनववर्ष