शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

क्षमता सव्वा लाख हेक्टरची ओलित 14 हजार हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव, नवरगाव, अडाण या प्रकल्पांसह ८५ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन करण्यात येते. या प्रकल्पांची सिंचन क्षमता १ लाख २७ हजार ५२५ हेक्टरची आहे.

ठळक मुद्देअपुरे कॅनॉल : गेट नसणे, अभियंत्यासह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले सिंचन प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. निर्माण झालेल्या सिंचन प्रकल्पातून ठरविलेले उद्दिष्ट अद्यापही गाठता आले नसल्याची गंभीरबाब सिंचनाच्या टक्केवारीवरून पुढे आली आहे. जिल्ह्यातील निर्मित प्रकल्पांची सिंचन क्षमता सव्वालाख हेक्टरची आहे. प्रत्यक्षात यातून केवळ १४ हजार १७९ हेक्टरवर ओलित होत आहे. यामुळे हे प्रकल्प शोभेची वस्तू ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव, नवरगाव, अडाण या प्रकल्पांसह ८५ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन करण्यात येते. या प्रकल्पांची सिंचन क्षमता १ लाख २७ हजार ५२५ हेक्टरची आहे. प्रकल्प उभे झाले, मात्र प्रकल्पात पाणी वाहून नेणारे कॅनॉल दोषपूर्ण आहे. या कॅनॉलमध्ये अनेक ठिकाणी चढउतार आहे. तर काही भागांमध्ये कॅनॉलच्या परिसरात मोठमोठी काटेरी झुडूपे उभे आहेत. यामुळे पाणी पुढे सरकत नाही. कॅनॉलला पाणी वाहून नेण्यासाठी असलेले दरवाजे अनेक ठिकाणी चोरीला गेले आहे. यामुळे कॅनॉलमधून एकदा पाणी सुटल्यानंतर ते एकाच भागात वाहत राहते. काम संपल्यानंतर पाटसऱ्यांचे गेट बंद करून पाणी पुढे जाण्याचा मार्ग दाखविला जात नाही. या ठिकाणी कार्यान्वित असणारे कर्मचारी अपुरे आहेत. यामुळे कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. कॅनॉलचे पाणी प्रत्येकाला मिळावे, यासाठी गावोगावी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या ठिकाणचे नियोजन मात्र होत नाही. यामुळे कुणी किती पाणी वापरावे याचे बंधन राहिलेले नाही. पाणीकर भरल्या जात नाही. यामुळे कॅनाॅलवरची दुरुस्ती होत नाही. पावसाळ्यात पूर आल्याने अनेक ठिकाणी कॅनॉलमध्ये मुरुम वाहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर संचय झाल्याचे चित्र पहायला मिळते. तर काही ठिकाणी हे कॅनॉल खचले आहे. त्यासाठी देखभाल दुरुस्तीचा मिळणारा निधीही अपुरा आहे. प्रकल्प क्षेत्रात पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. हजारो हेक्टर जमीन धरणात, पण सिंचन वाढलेच नाही प्रकल्प क्षेत्रामध्ये सिंचन होईल म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रत्यक्षात प्रकल्प झाल्यानंतर या प्रकल्प क्षेत्रात अजूनही पूर्ण क्षमतेने सिंचन झाले नाही. याची खंत आजही या भागातील शेतकरी बोलून दाखवितात. प्रकल्पासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. यातून अनेक जण धरणग्रस्त म्हणून नोंदविल्या गेलेत. त्यांच्या जमिनीचे मूल्य सिंचन न झाल्याने शून्य झाल्यासारखेच आहे. एकीकडे जमिनी गेल्या, दुसरीकडे उत्पन्नाचे साधनही गेले. अशा परिस्थितीत बेरोजगारी या कुटुंबांपुढे उभे ठाकली आहे. राज्य शासनाने प्रकल्प क्षेत्रामध्ये पुन्हा नव्या जोमाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे आणि प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी गावांमध्ये होत आहे. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प