शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

क्षमता सव्वा लाख हेक्टरची ओलित 14 हजार हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव, नवरगाव, अडाण या प्रकल्पांसह ८५ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन करण्यात येते. या प्रकल्पांची सिंचन क्षमता १ लाख २७ हजार ५२५ हेक्टरची आहे.

ठळक मुद्देअपुरे कॅनॉल : गेट नसणे, अभियंत्यासह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले सिंचन प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. निर्माण झालेल्या सिंचन प्रकल्पातून ठरविलेले उद्दिष्ट अद्यापही गाठता आले नसल्याची गंभीरबाब सिंचनाच्या टक्केवारीवरून पुढे आली आहे. जिल्ह्यातील निर्मित प्रकल्पांची सिंचन क्षमता सव्वालाख हेक्टरची आहे. प्रत्यक्षात यातून केवळ १४ हजार १७९ हेक्टरवर ओलित होत आहे. यामुळे हे प्रकल्प शोभेची वस्तू ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव, नवरगाव, अडाण या प्रकल्पांसह ८५ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन करण्यात येते. या प्रकल्पांची सिंचन क्षमता १ लाख २७ हजार ५२५ हेक्टरची आहे. प्रकल्प उभे झाले, मात्र प्रकल्पात पाणी वाहून नेणारे कॅनॉल दोषपूर्ण आहे. या कॅनॉलमध्ये अनेक ठिकाणी चढउतार आहे. तर काही भागांमध्ये कॅनॉलच्या परिसरात मोठमोठी काटेरी झुडूपे उभे आहेत. यामुळे पाणी पुढे सरकत नाही. कॅनॉलला पाणी वाहून नेण्यासाठी असलेले दरवाजे अनेक ठिकाणी चोरीला गेले आहे. यामुळे कॅनॉलमधून एकदा पाणी सुटल्यानंतर ते एकाच भागात वाहत राहते. काम संपल्यानंतर पाटसऱ्यांचे गेट बंद करून पाणी पुढे जाण्याचा मार्ग दाखविला जात नाही. या ठिकाणी कार्यान्वित असणारे कर्मचारी अपुरे आहेत. यामुळे कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. कॅनॉलचे पाणी प्रत्येकाला मिळावे, यासाठी गावोगावी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या ठिकाणचे नियोजन मात्र होत नाही. यामुळे कुणी किती पाणी वापरावे याचे बंधन राहिलेले नाही. पाणीकर भरल्या जात नाही. यामुळे कॅनाॅलवरची दुरुस्ती होत नाही. पावसाळ्यात पूर आल्याने अनेक ठिकाणी कॅनॉलमध्ये मुरुम वाहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर संचय झाल्याचे चित्र पहायला मिळते. तर काही ठिकाणी हे कॅनॉल खचले आहे. त्यासाठी देखभाल दुरुस्तीचा मिळणारा निधीही अपुरा आहे. प्रकल्प क्षेत्रात पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. हजारो हेक्टर जमीन धरणात, पण सिंचन वाढलेच नाही प्रकल्प क्षेत्रामध्ये सिंचन होईल म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रत्यक्षात प्रकल्प झाल्यानंतर या प्रकल्प क्षेत्रात अजूनही पूर्ण क्षमतेने सिंचन झाले नाही. याची खंत आजही या भागातील शेतकरी बोलून दाखवितात. प्रकल्पासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. यातून अनेक जण धरणग्रस्त म्हणून नोंदविल्या गेलेत. त्यांच्या जमिनीचे मूल्य सिंचन न झाल्याने शून्य झाल्यासारखेच आहे. एकीकडे जमिनी गेल्या, दुसरीकडे उत्पन्नाचे साधनही गेले. अशा परिस्थितीत बेरोजगारी या कुटुंबांपुढे उभे ठाकली आहे. राज्य शासनाने प्रकल्प क्षेत्रामध्ये पुन्हा नव्या जोमाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे आणि प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी गावांमध्ये होत आहे. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प