शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवं होतं; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 18:30 IST

पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत.

यवतमाळ - नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी आवाज उठविला असला तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, तसे झाले असते तर अनेक शेतकरी-शेतमजुरांचे जीव वाचू शकले असते असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी केले आहे. 

पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. अखेर वन खात्याने या वाघिणीला नुकतेच गोळी घालून ठार केले. मात्र तिला गोळ्या का घातल्या म्हणून वन्यजीवप्रेमींनी देशभर ओरड चालविली आहे. मुख्यमंत्री, वनमंत्री यांना धारेवर धरले जात आहे. वन खात्याची नियमावली वाचून दाखविली जात आहे. त्याच वेळी या दोन विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेसकडून अनेक वर्ष प्रतिनिधीत्व करणारे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके (राळेगाव), अ‍ॅड. शिवाजीराव मोघे (केळापूर-आर्णी) आणि मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी मात्र जनतेच्या हितासाठी वाघिणीला ठार करण्याच्या वन खात्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे. 

वन खात्याने संयम राखला  - अ‍ॅड.  मोघे 

वन खात्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कोणतेही प्रयत्न न करता थेट गोळ्या घातल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींकडून होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याने अवनीला पकडण्यासाठी खूप संयम राखला व वर्षभर प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. तिला ठार मारायचे नव्हते, बेशुद्ध करण्याचेच प्रयत्न झाले. मात्र ती टप्प्यात येत नव्हती. अखेर वन खात्याचाही नाईलाज झाला. कारण जनतेचे जीव महत्वाचे असल्याचे मोघे यांनी सांगितले.

वनखात्याने विलंब केला - प्रा. पुरके

माजी मंत्री प्रा. वसंत पुरके म्हणाले, वाघिणीने पहिली शिकार केल्यानंतर वन खात्याने लगेच पावले उचलून तिला बेशुद्ध करण्याचे, पकडण्याचे प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र वन खात्याने त्याकडे बरेच दुर्लक्ष केले. मध्यंतरीच्या काळात तिला बेशुद्ध करण्याच्या मिळालेल्या तीन संधी  दवडल्या गेल्या. १३ जीव गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, वाघिणीच्या दहशतीत हजारो एकर शेती पडिक आहे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे गरजेचेच होते. वन्यजीवप्रेमींनी प्रत्यक्ष वाघदहशतग्रस्त भागात भेट दिल्यास त्यांना ‘वास्तव’ कळू शकेल, असेही पुरके यांनी सांगितले.

मनेका गांधी शेतकरी विरोधी -  तिवारी

वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, दिल्ली, मुंबईत बसलेल्या वन्यजीवप्रेमींनी वन खात्याच्या वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेत याचिका व अन्य माध्यमातून सातत्याने अडथळे आणले. आजही ही मंडळी वन खात्यावर तोंडसुख घेत आहे. त्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत. मात्र त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. पर्यायाने त्यांच्याकडून सरकारवर केली जात असलेली टीका शेतकरी व आदिवासी विरोधी ठरत आहे. अशा आगावू मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच आवर घालावा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना विनम्रपणे दिलेल्या उत्तराचे किशोर तिवारी यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAvani Tigressअवनी वाघीणcongressकाँग्रेस