शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नव्या जिल्हाधिकाऱ्यांची ब्रिगेड सुधारणार जिल्हा परिषदेच्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांची गुणवत्ता घटत असल्याचे जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आले. मात्र या शाळांमधील अनेक शिक्षक चांगले काम करीत आहेत. त्यांचा उपयोग करून सर्वच शाळांमधील अध्यापन सुधारण्यासाठी सिंह यांनी पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्दे३२५ शिक्षकांची फौज । गुरुवारी देणार ‘टास्क’, प्रत्येक विषयाचे शिक्षक निवडणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वत: सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेऊन आयएएस झालेले जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यवतमाळात रुजू होताच त्यांची पहिली नजर जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर गेली. त्यामुळे आल्या-आल्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तम ३२५ शिक्षक निवडून त्यांची ‘ब्रिगेड’ तयार केली आहे. येत्या गुरुवारी जिल्हास्तरीय बैठक घेऊन या शिक्षकांना विशेष ‘टास्क’ दिला जाणार आहे.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांची गुणवत्ता घटत असल्याचे जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आले. मात्र या शाळांमधील अनेक शिक्षक चांगले काम करीत आहेत. त्यांचा उपयोग करून सर्वच शाळांमधील अध्यापन सुधारण्यासाठी सिंह यांनी पाऊल उचलले आहे. गणित, मराठी, इंग्रजी, हिंदी, सामाजिक शास्त्र, विज्ञान या प्रत्येक विषयांचे उत्तम शिक्षक निवडून ३२५ शिक्षकांची ‘शिक्षक ब्रिगेड’ त्यांनी ५ मार्च रोजी स्थापन केली. त्याकरिता प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयाचे ३ उत्तम शिक्षक निवडण्यात आले आहे. मात्र, पुसद तालुक्यातून इंग्रजीचे, सामाजिक शास्त्राचे उमरखेड तालुक्यातून, विज्ञानाचे यवतमाळ तालुक्यातून आणि गणित विषयाचे महागाव तालुक्यातून ४ शिक्षक घेण्यात आले आहे.ब्रिगेड नेमके काय करणार?कोणत्या विषयात विद्यार्थी मागे आहे, याची वर्गनिहाय माहिती गोळी केली जाणार आहे. त्याची कारणे नोंदविली जाणार आहे. त्यानंतर संबंधित विषय अधिक सोपा करून कसा शिकविता येईल, याचे तंत्र या शिक्षकाकडून विचारले जाईल. हे तंत्र त्यांच्या-त्यांच्या तालुक्यातील मागास शाळांतील शिक्षकांना समजावून सांगितले जाईल. त्याच परिसरातील खासगी शाळांमध्ये कोणते अध्यापन तंत्र वापरले जाते, याचा अभ्यास करून जिल्हा परिषद शाळेतही त्याच तोडीचे अध्यापन तंत्र वापरण्यावर भर दिला जाईल.प्रत्येकाला शिकविणार संगणकया ब्रिगेडमध्ये ३३ संगणक शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संगणकाचे धडे या माध्यमातून दिले जाणार आहे. भविष्यात जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आयटी क्षेत्रासाठीही तयार व्हावे, हा यामागील हेतू असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, या ३२५ शिक्षकांना १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. कोणीही गैरहजर राहता कामा नये, असे आदेश शिक्षणाधिकाºयांनी बजावले आहेत.पदोन्नतीची मिळणार संधीदरम्यान, गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची ब्रिगेड तयार करण्यात आली असली तरी जिल्ह्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह म्हणाले, या ब्रिगेडमध्ये जे शिक्षक चांगले काम करतील, त्यांनाच पुढे ‘मोठी जबाबदारी’ दिली जाईल.मी चंद्रपूर जिल्हा परिषदेत सीईओ असताना अशी ब्रिगेड तयार केली होती. तेथे मला अल्प कालावधी मिळाला. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये ब्रिगेडद्वारे लवकरच चांगल्या सुधारणा पाहायला मिळतील.- एम. डी. सिंह, जिल्हाधिकारी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी