शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:03 AM

दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

ठळक मुद्दे३५ लाखांचे नुकसान : दिल्लीवरून हैद्राबादकडे जात होता कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसचा आर.जे.१०-जी.बी.२०५८ क्रमांकाचा कंटेनर दिल्ली येथील शोरूममधील चपला, बुट, दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर, आॅईलचे डब्बे, पंखे, खेळाचे साहित्य, सिडीजचे डब्बे, चपला, बुट तयार करण्याचा कच्चा माल व स्टेशनरी सामान घेऊन हैद्राबादकडे जात होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हैद्राबाद मार्गावरील वाय पॉर्इंटवर डाव्या बाजुला कंटेनर लावून चालक व क्लिनर शहरातील जवळच असलेल्या एटीएम केंद्रात पैसे आणावयासाठी गेले. पैसे घेऊन परत कंटेनरजवळ येत नाही तोच, त्यांना कंटेनरच्या कॅबिनमधून धुराचे लोट येताना दिसले. क्षणार्धात कंटेनरच्या कॅबिनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. हे दृष्य दिसताच, या रस्त्याने जाणाºया राजेश्वर पारीख व कुणाल राशतवार यांनी पोलीस व नगरपरिषदेला माहिती दिली. तोपर्यंत कॅबिनमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले.त्यानंतर ही आग झपाट्याने कॅबिनच्या मागे असलेल्या कंटेनरमधील साहित्याकडे गेली. आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, पांढरकवडा नगरपरिषदेचे टँकर, फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कंटेनरमधील ५० टक्क्यापेक्षा जास्त साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेल्या वाय पॉर्इंटवर उभ्या कंटेनरला आग लागल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली होती. काही वेळ वाहतुकही ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण महल्ले व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यतासध्या उष्णतामानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. आगी लागण्याच्या प्रमाणाताही वाढ होत आहे. कंटेनरला लागलेली ही आग अतिउष्णतेने शॉर्टसर्किट होऊन लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. कंटेनरची बॅटरी किंवा इंजिन गरम होऊन ठिणगी पडून ही आग लागली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसच्या मालकाला देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले. या आगीत ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :fireआग