शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

बोदेगाव साखर कारखाना २२२ कोटींच्या कर्जासाठी काढला विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २२२ कोटींचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी आता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. 

ठळक मुद्देकर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेचा निर्णय, दारव्हासह सहा तालुके बाधित

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य बँकेने यासंदर्भात निविदा मागविल्या असून विक्रीनंतर कारखान्याचे भवितव्य काय, याबाबत या सहा तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे.दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २२२ कोटींचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी आता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. विकासाचा दृृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्याची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बोदेगाव हे मध्यवर्ती ठिकाण ठरवून १६ मे १९८९ रोजी जयकिसानची नोंदणी करण्यात आली. यवतमाळमधील दारव्हा, नेर व दिग्रस, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा व मंगरूळ हे तालुके कार्यक्षेत्र ठरवून या भागात आठ हजार ८३० सभासद करण्यात आले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर प्रती दिवस अडीच हजार टन गाळप क्षमतेच्या कारखाना अस्तित्वात आला. १९९२ ला चाचणी हंगामात १५५० मेट्रिक टन गाळप झाले. १९९३ ला ४५ हजार ७६५ मेट्रिक टन गाळप झाले. १९९७ व १९९९ हे दोन वर्ष गाळप बंद होते. हे वर्ष सोडले तर दहा वर्षात एकुण नऊ लाख ८६ हजार ७११ मेट्रिक टन इतके गाळप झाले. नंतर दुष्काळी परिस्थितीमुळे २००४ साली कारखाना बंद पडला. गाळप क्षमतेइतका ऊस उपलब्ध झाला नाही. ऊस वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली. साखर उताऱ्यात घट, क्षमतेइतके गाळप न झाल्याने दीर्घ, मध्यम मुदती कर्जाच्या मुद्दलाचे हप्ते वेळेवर न भरता आल्याने व्याजाच्या बोजात वाढ झाली. कर्जाचा भरणा वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणात कर्ज थकले. त्यामुळे २००६ मध्ये कारखाना अवसायनात गेला. त्यानंतर कारखाना बंद पडून नुकसान होऊ नये म्हणून तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला २००६ ते २०१२ या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला. त्यांनी तीन हंगामात यशस्वी गाळप केले. परंतु २००८ ते २०१० या वर्षात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गाळप हंगाम न घेता उभयपक्षी झालेला करार एकतर्फी संपुष्टात आला. त्यामुळे २००९ पासून कारखाना बंद पडला.कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी ऊस शेतकरी आग्रहीमोठा गाजावाजा करून शरद पवार यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. अडाण, अरूणावती यासह अनेक प्रकल्पामुळे या परिसरात सिंचनाची सुविधा आहे. ऊस लागवडीसाठी कारखान्याकडून प्रयत्न करून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. या परिसरात अनेकांना नोकरी व इतर रोजगार मिळाला. अनेक उद्योग, व्यवसायाला चालना मिळाली होती. परिसराचा कायापालट होत असताना कारखाना बंद पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या अटीवरच विकला जावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेsaleविक्री