शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचा भाजपला विसर : सपकाळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:35 IST

Yavatmal : काँग्रेसची दाभडी ते आर्णी शेतकरी सन्मान पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी (यवतमाळ): २०१४ मध्ये दाभडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासह तब्बल १६ आश्वासने दिली होती. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या ११ वर्षात यापैकी एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केलेले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळेच आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी काँग्रेसतर्फे दाभाडीतील ओंकारेश्वर मंदिरापासून ही पदयात्रा निघाली.

यात्रेत गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिस अहमद, वसंत पुरके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार राजेश राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्णी येथे पदयात्रेचे मेळाव्यात रूपांतर झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, या घोषणांचे काय झाले? यातील एक तरी घोषणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पूर्ण केली का? असा सवाल करीत हे सरकार केवळ धनाड्या उद्योगपतींचे असल्याचे ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात शेतकरी, शेतमजूर समाधानी होता, यावर त्यांनी जोर दिला.

माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, असा सवाल सरकारला केला. ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, सर्वसामान्यात सरकारच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारला केवळ उद्योगपतींची काळजी

  • राज्यातील शेतकऱ्यांचे आज प्रचंड हाल सुरू आहेत. हरभरा, कापूस, सोयाबीन, तुरीसह कांद्याला भाव नाही.
  • सोयाबीनला ३५ ते ४० रुपये किलो भाव असताना सोयाबीन तेलाची किंमत मात्र १६५ रुपये लिटरवर गेली आहे. हा मधला मलिदा उद्योगपती खात आहेत.
  • भाजपने 'हर घर तिरंगा अभियान राबविले. मात्र, त्यासाठी चीनमधून पॉलिस्टरचे झेंडे मागविल्याची टीका करीत शेतकरी, शेतमजुरांच्या हक्काची लढाई काँग्रेस यापुढेही लढत राहील, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ