शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचा भाजपला विसर : सपकाळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:35 IST

Yavatmal : काँग्रेसची दाभडी ते आर्णी शेतकरी सन्मान पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी (यवतमाळ): २०१४ मध्ये दाभडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासह तब्बल १६ आश्वासने दिली होती. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या ११ वर्षात यापैकी एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केलेले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळेच आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी काँग्रेसतर्फे दाभाडीतील ओंकारेश्वर मंदिरापासून ही पदयात्रा निघाली.

यात्रेत गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिस अहमद, वसंत पुरके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार राजेश राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्णी येथे पदयात्रेचे मेळाव्यात रूपांतर झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, या घोषणांचे काय झाले? यातील एक तरी घोषणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पूर्ण केली का? असा सवाल करीत हे सरकार केवळ धनाड्या उद्योगपतींचे असल्याचे ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात शेतकरी, शेतमजूर समाधानी होता, यावर त्यांनी जोर दिला.

माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, असा सवाल सरकारला केला. ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, सर्वसामान्यात सरकारच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारला केवळ उद्योगपतींची काळजी

  • राज्यातील शेतकऱ्यांचे आज प्रचंड हाल सुरू आहेत. हरभरा, कापूस, सोयाबीन, तुरीसह कांद्याला भाव नाही.
  • सोयाबीनला ३५ ते ४० रुपये किलो भाव असताना सोयाबीन तेलाची किंमत मात्र १६५ रुपये लिटरवर गेली आहे. हा मधला मलिदा उद्योगपती खात आहेत.
  • भाजपने 'हर घर तिरंगा अभियान राबविले. मात्र, त्यासाठी चीनमधून पॉलिस्टरचे झेंडे मागविल्याची टीका करीत शेतकरी, शेतमजुरांच्या हक्काची लढाई काँग्रेस यापुढेही लढत राहील, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ