शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
4
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
5
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
6
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
7
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
8
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
9
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
10
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
11
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
12
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
13
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
14
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
15
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
16
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
17
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
18
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
19
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
20
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?

शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचा भाजपला विसर : सपकाळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:35 IST

Yavatmal : काँग्रेसची दाभडी ते आर्णी शेतकरी सन्मान पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी (यवतमाळ): २०१४ मध्ये दाभडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासह तब्बल १६ आश्वासने दिली होती. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या ११ वर्षात यापैकी एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केलेले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळेच आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी काँग्रेसतर्फे दाभाडीतील ओंकारेश्वर मंदिरापासून ही पदयात्रा निघाली.

यात्रेत गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिस अहमद, वसंत पुरके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार राजेश राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्णी येथे पदयात्रेचे मेळाव्यात रूपांतर झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, या घोषणांचे काय झाले? यातील एक तरी घोषणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पूर्ण केली का? असा सवाल करीत हे सरकार केवळ धनाड्या उद्योगपतींचे असल्याचे ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात शेतकरी, शेतमजूर समाधानी होता, यावर त्यांनी जोर दिला.

माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, असा सवाल सरकारला केला. ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, सर्वसामान्यात सरकारच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारला केवळ उद्योगपतींची काळजी

  • राज्यातील शेतकऱ्यांचे आज प्रचंड हाल सुरू आहेत. हरभरा, कापूस, सोयाबीन, तुरीसह कांद्याला भाव नाही.
  • सोयाबीनला ३५ ते ४० रुपये किलो भाव असताना सोयाबीन तेलाची किंमत मात्र १६५ रुपये लिटरवर गेली आहे. हा मधला मलिदा उद्योगपती खात आहेत.
  • भाजपने 'हर घर तिरंगा अभियान राबविले. मात्र, त्यासाठी चीनमधून पॉलिस्टरचे झेंडे मागविल्याची टीका करीत शेतकरी, शेतमजुरांच्या हक्काची लढाई काँग्रेस यापुढेही लढत राहील, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ