शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप; अजित पवारांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:09 IST

राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधा-यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करीत आहेत.

यवतमाळ : राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधा-यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करीत आहेत. मात्र लगतच्या भविष्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारीत याचे पडसाद पाहायला मिळतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा यवतमाळात दाखल झाली. बुधवारी पुढच्या प्रवासापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवाद व देशाच्या मुद्द्यावर झाली. राज्यातील निवडणुका या स्थानिक मुद्द्यावर होतात. युती सरकारने मागील पाच वर्षात सर्वांचीच प्रचंड निराशा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला निश्चितच चांगले दिवस आहेत. भाजप-सेनेत जाणा-यांची संख्या, त्या पक्षातील आज असलेले आमदार आणि राज्यातील २८८ जागा याचे गणित जुळणारे नाही. त्यामुळे निवडणूक उमेदवारी दाखल होताना अनेक राजकीय भूकंपाचे धक्के पाहायला मिळतील. राष्ट्रवादीने नव्या चेह-यांना संधी दिली.डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांच्या सारखे प्रतिभासंपन्न युवक पक्षाकडे आहेत. पक्षांतराबाबत जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत. काँग्रेससोबतची आघाडी निश्चित असून, मित्र पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ४० वरून आता १४४ जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखविली आहे. जसे जसे दिवस जवळ येतील तसतशी स्थिती बदलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले, पुसदचे आमदार मनोहरराव नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चेबाबत आपल्याकडे कोणतीच माहिती नाही. मात्र उदयनराजे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्नरत असल्याचे पवार म्हणाले. राज्य सरकार ७२ हजार जागांची मेगा भरती घेणार होते, त्याचे काय झाले, शिक्षकांची भरती बंद आहे. यवतमाळातील एका मोठ्या समूहाने ३०० कंत्राटी कामगारांना कमी केल्याचे सांगितले जाते. एकंदरच राज्यात मंदीची स्थिती आहे. अशा वेळेस सरकारातील मंत्री मौज मस्तीत दंग आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आठवड्यातून दोनदा कॅबिनेटच्या बैठका घेऊन विविध आमिष दाखविले जात आहे. मात्र घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला किमान दोन महिन्यांचा अवधी लागतो. शासन केवळ धूळफेक करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस