ज्ञानरचनावादाने उडविली जिल्ह्यातील शिक्षकांची भंबेरी

By Admin | Updated: February 22, 2016 02:37 IST2016-02-22T02:37:41+5:302016-02-22T02:37:41+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी वर्षभरापासून डिजिटल शाळांचा प्रणच घेतला आहे.

Bhabheri of teachers in the district fired by GyanChanwadha | ज्ञानरचनावादाने उडविली जिल्ह्यातील शिक्षकांची भंबेरी

ज्ञानरचनावादाने उडविली जिल्ह्यातील शिक्षकांची भंबेरी

शिक्षण विभागाचे फर्मान : अर्धवट माहितीवर झटपट प्रगतीची घाई
अविनाश साबापुरे यवतमाळ
जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी वर्षभरापासून डिजिटल शाळांचा प्रणच घेतला आहे. गावकऱ्यांना डिजिटलचे महत्त्व पटवून देत लोकवर्गणी गोळा केली. डिजिटल क्लासरूमद्वारे शाळांची प्रतिमा सुधारत असतानाच अचानक ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती लादण्यात आल्याने शिक्षक बिथरले आहेत. थोडक्या कालावधीतच जिल्ह्यातील निम्म्या शाळांमध्ये ज्ञानरचनावाद स्वीकारला गेला असला, तरी शिक्षकांच्या मनातच ज्ञानरचनावादाची संकल्पना ‘क्लिअर’ नसल्याने ती रूजू शकलेली नाही.
वास्तविक पाहाता, २००५ सालच्या अभ्यासक्रम आराखड्यातच ज्ञानरचनावाद ही संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, २००५ ते २०१६ या अकरा वर्षात ज्ञानरचनावादाबाबत शासनस्तरावरून कोणताही प्रचार-प्रसार झाला नाही. त्यामुळे शिक्षक रचनावादाबद्दल पूर्णत: अनभिज्ञ राहिले. परंतु, २०१५ हे वर्ष संपता-संपता अचानक ज्ञानरचनावाद सुरू करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले. सातारा जिल्ह्यातील कुमठे बिटाने काही वर्षांपूर्वीपासूनच ज्ञानरचनावाद स्वयंस्फूर्तीने स्वीकारून यशस्वी केला. त्यांचाच कित्ता आता संपूर्ण राज्यातील शाळांना गिरवायचा आहे. पण कुमठे बिटाइतका कालावधी जिल्ह्यातील शिक्षकांना मिळाला नाही. तरीही जिल्ह्यातील दोन हजारपैकी दीड हजार शाळांनी ज्ञानरचनावादावर अमल सुरू केला. न आकळलेला ज्ञानरचनावाद रुजला नाही.

Web Title: Bhabheri of teachers in the district fired by GyanChanwadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.