शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लेकरं बेमार.. म्हतारे राखनीले... न् झोपडं बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:42 IST

नईतरुन पोरं बेमार पल्ले बाप्पा... आमी म्हतारे त्याह्यच्यासंग दवाखान्यात राखनीले बसून हावो. मजुरी नाई न् फजुरी नाई... मजबुरी हाये. आमच्यासाठी फवारले गेल्ता आता त्येच्यासाठी आमीस आलो..

ठळक मुद्देफवारणीतल्या मजुरांचे मायबाप निराधार : कोरड्या राजकीय भेटींनी सांत्वनाऐवजी संताप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नईतरुन पोरं बेमार पल्ले बाप्पा... आमी म्हतारे त्याह्यच्यासंग दवाखान्यात राखनीले बसून हावो. मजुरी नाई न् फजुरी नाई... मजबुरी हाये. आमच्यासाठी फवारले गेल्ता आता त्येच्यासाठी आमीस आलो.. घरात काय शिजत असन काय सांगाव? लोकं येऊन भेटून चाल्ले, त्याह्यच्या येण्यानं तब्येतय सुधरत नाई अन् मजुरीबी भेटत नाई...पुढ का का घडन का सांगू बाप्पा...फवारणीतून विषबाधीत झालेल्या गोरगरिबांना दररोज भेटी देणाºया व्हीआयपी मंडळींच्या काळजाला दिग्रसच्या (बेलोरा) वृद्ध वच्छलाबार्इंची ही व्यथा पाझर फोडू शकेल का? वच्छलाबार्इं भरभडे यांचा तरुण मुलगा दसºयाच्या आदल्या दिवशी फवारणीच्या मजुरीला गेला होता. पण विषबाधा झाली. मुलगा दवाखान्यात सून बाळंतपणाला माहेरी अन् म्हाताºया वच्छलाबाई मुलासोबत...ही वृद्ध आई म्हणाली, ‘दहा दिस झाले, आमी कोनीस मजुरीले नाई गेलो. घरी लहान लेकरू हाये.. काय रांधत असन अन् काय खात असन देवालेस ठाऊक. येच्या ईलाजाले पैसे नोहोते. याले दोनशे मांग, त्याले दोनशे मांग असं करूनश्यानं गाडं लोटत होवो..!’ फवारणीच्या मजुरीला जाणारे अन् त्यात विषबाधा झालेले सारेच गावाकडचे तरुण आहेत. असे शेकडो तरुण आज शासकीय रुग्णालयात तडफडत आहेत. त्यांच्याकडे काळजीने पाहात, डोळे पुसत बसलेले म्हातारे आईवडील नातवांचे चेहरे आठवून आठवून देवाची करुणा भाकत आहेत.‘नयीतरुन पोरं फवारणीनं भोकने होऊने बसले... सरकार पैसे देईन म्हंते. पण थ्या पैशाले का चाटन का त्याह्यचे बायकापोरं? पुढं एवढं मोठं आयुष्य हाये...’ बाजूच्याच बेडवरच्या बाधीत तरुणाची आई चंद्रकला कातावून बोलल्या, ‘आत्ताशीनच येक कोन हो का तं नेताजी येऊन गेला. मत मांगतल्यावानी टोंडाकडं पाहे.. माहा पोरगं ढोरावानी बोंबलते.. आग आग म्हंते.. अन् ह्ये नेताजी म्हने न्याय भेटन.. अगा कवा भेटन थो न्याय? पोटासाठी डोळे देल्ले आता डोळ्यायसाठी जीव घेसान का?’विषबाधेने कळवळणाºया पोरांकडे पाहून म्हाताºया आईवडिलांवरच जीव सोडण्याची वेळ आली आहे. पण राजकीय पक्षांचे पुढारी राजकीय बॅनर लावूनच त्यांच्या भेटी घेत आहेत. भेटी देणारे केवळ सुतकी चेहरे करून उभे राहतात आणि खूप मोठी समाजसेवा केल्याच्या आविर्भावात आले तसे निघून जातात. त्यांचे कोरडे शब्द संतापाचे कारण ठरत आहेत. तोच संताप पती गमावलेल्या कळंबच्या मंगला देवीदास मडावी या महिलेने व्यक्त केला, बारा दिवसापासून रोज लोकं आमाले भेटाले येऊन राह्यले. मंग आमाले कामाले कसं जाता येईन? कामावर गेलो तरी पोलीस धरू-धरू घरी आणते. तुमी लोकं येता, पण माही मजुरी बिडते अन् तुमी तरी का देता? काल तं माह्याजवळ तेल न् चहापत्ती घ्याले पैसे नव्हते. १० रुपये उसने घेतले अन् दिवस ढकलला...’तिवसाचा ब्रह्मानंद श्रीराम आडे, कोची ता. राळेगावचा अरुण नागोजी आत्राम हे डोळे गमावून बसले आहे. त्यांच्याच बाजूच्या बेडवर तळणीचा (ता. आर्णी) राहुल पंजाब मंगल पवार हा तरुणही विव्हळत आहे. आपल्या वेदना तो रोज नातेवाईकांना मोडक्या तोडक्या भाषेत कागदावर लिहून सांगतोय. ‘गळ्यात काहीतरी लटकल्यासारखं वाटते’ हे त्याचे शब्द डॉक्टर, कृषी अधिकारी, कृषीमंत्र्यांना कळतील का?उत्सवी कार्यकर्त्यांनो, माणसांना मदत करासरकारने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली, अजून भेटली नाही. जिवंत माणसं तळमळत आहे. त्यांना केवळ राजकीय भावनेतून भेटी देण्याचा सपाटा सुरू आहे. सरकार तर झोपलेले आहेच. पण यवतमाळच्या समाजिक संस्थाही निपचित आहेत. एकाही संस्थेने रुग्णालयात जाऊन रुग्णांची वास्तपूस्त केली नाही, की नातेवाईकांच्या जेवणाची सोय केली नाही. इतर उपक्रमांवर भरमसाठ खर्च करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनी जिवंत माणसांसाठी काहीतरी करण्याची आता वेळ आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या गरिबांसाठी आता पुढे यावे, असे मत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केले.