वणी शहराला लागले समस्यांचे ग्रहण

By Admin | Updated: June 10, 2016 02:36 IST2016-06-10T02:36:55+5:302016-06-10T02:36:55+5:30

शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून त्या सोडवाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

Bani city started to take up the issue | वणी शहराला लागले समस्यांचे ग्रहण

वणी शहराला लागले समस्यांचे ग्रहण

वणी : शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून त्या सोडवाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
शहराची जीवनदायीनी असलेल्या निर्गुडा नदीचे रूंदीकरण, खोलीकरण व सौंदर्यीकरण लोकसहभागातून पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून नगरपरिषद शुद्ध पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप भाजपाने केला.
आता लवकरच पावसाळ्याला सुरूवात झाली असून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन जागोजागी लिकेज आहे. पाण्याचे शद्धिकरण होत नसल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात गॅस्ट्रो व इतर पोटांच्या विकाराने ग्रासण्याची शक्यता आहे. शहरातील नाल्या तुंबल्या आहे. सोबतच रस्त्यांवरील खड्डे, फुटलेले धापे, नगरपरिषद शाळेजवळ घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रार्दुर्भाव आदींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचा दावा भाजपाने केला आहे.
या समस्यांचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असून त्याला नगरपरिषद जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व समस्या सोडविण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष रवी बेलुरकर, कुंतलेश्वर तुरविले, संतोष डंभारे, अरूण कावटकर, प्रेमिला हस्तक, छाया जन्नावार, सुनील पवार, नीलेश डवरे, विजू मेश्राम, आशिष डंभारे, महेंद्र शंभरकर, राजेंद्र सिडाम, कौशिक खेरा, आदींनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Bani city started to take up the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.