शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

दारूबंदी झुगारून होते खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे असहकार्य; महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, तरुणाई व्यसनाधीन

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ २०१५ मध्ये उभी झाली. स्वामिनीसह काही संघटना पुढे सरसावल्या आणि २५० गावांमध्ये दारूबंदी झाली. आज जिल्ह्यातील या गावांसह इतरही गावांमध्ये दारूबंदी आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.यवतमाळ तालुक्यातील बोथबोडनमध्ये आजही दारू विकली जाते. पूर्वी हातभट्टी होती आता देशीचे पव्वे गावामध्ये पोहोचत आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये कायम आहे. यातून गावगाडा विकासाकडे न जाता तो भरकटला जात आहे.

गावकऱ्यांच्या पाठिशीचठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दारूबंदी करण्यासाठी आम्ही तयार आहो. गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना पूर्ण मदत करू. काही ठिकाणी दारूबंदी करण्यात आली आहे. दारूबंदीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - विनायक कारेगावकर,ठाणेदार, लाडखेड

दारूबंदीच्या निर्णयाची प्रतीक्षातत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दारूबंदी झालीच नाही. तिला केवळ राजकीय स्वरूप मिळत आहे.

धमक्यांमुळे गाव सोडलेआम्ही पहापळमध्ये दारूबंदी केली. दोन-तीन वर्ष गाव उत्तमरित्या काम करीत होते. महिलांचा चांगला सहभाग होता. पोलीस प्रशासनाची मदत होती. मात्र काही काळानी प्रशासनाची मदत दूर झाली आणि महिलांना धमक्या मिळू लागल्या. या त्रासाला कंटाळून मी गाव सोडले. मात्र काम करण्याची इच्छा अजून आहे. - भावना नव्हाते, पांढरकवडा

अजूनही जिद्द कायमजरूरमध्ये दारूबंदीसाठी आम्ही महिलांनी मिळून काम केले. गावामध्ये दोन ते तीन वर्ष दारूबंदी कायम होती. महिलांवर खोटे आरोप लागले, गुन्हे दाखल झाले. यामुळे महिला खचल्या. आज गावात दारू सुरू आहे. यातून गाव अस्वस्थ झाले आहे. पुढील काळात दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही महिला काम करणार आहोत. - ललिता राठोड, जरूर, ता.घाटंजी

प्रशासनाची मदत नाहीधनज माणिकवाडामध्ये दारूबंदी करण्यात आली. या कामात सर्वांचेच सहकार्य मिळाले. मी आजारी पडलो आणि पुन्हा दारू सुरू झाली. खरं सांगायचे म्हणजे, पोलीस प्रशासनाची आम्हाला मदत मिळत नाही. यामुळे गावात दारू विकल्या जाते. दारूबंदीसाठी गावकरी तयार आहे, पोलीस यंत्रणा सोबत येईल का ? - अमित दाभेरे, तंटामुक्ती अध्यक्ष, धनज माणिकवाडा

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस