शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

दारूबंदी झुगारून होते खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे असहकार्य; महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, तरुणाई व्यसनाधीन

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ २०१५ मध्ये उभी झाली. स्वामिनीसह काही संघटना पुढे सरसावल्या आणि २५० गावांमध्ये दारूबंदी झाली. आज जिल्ह्यातील या गावांसह इतरही गावांमध्ये दारूबंदी आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.यवतमाळ तालुक्यातील बोथबोडनमध्ये आजही दारू विकली जाते. पूर्वी हातभट्टी होती आता देशीचे पव्वे गावामध्ये पोहोचत आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये कायम आहे. यातून गावगाडा विकासाकडे न जाता तो भरकटला जात आहे.

गावकऱ्यांच्या पाठिशीचठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दारूबंदी करण्यासाठी आम्ही तयार आहो. गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना पूर्ण मदत करू. काही ठिकाणी दारूबंदी करण्यात आली आहे. दारूबंदीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - विनायक कारेगावकर,ठाणेदार, लाडखेड

दारूबंदीच्या निर्णयाची प्रतीक्षातत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दारूबंदी झालीच नाही. तिला केवळ राजकीय स्वरूप मिळत आहे.

धमक्यांमुळे गाव सोडलेआम्ही पहापळमध्ये दारूबंदी केली. दोन-तीन वर्ष गाव उत्तमरित्या काम करीत होते. महिलांचा चांगला सहभाग होता. पोलीस प्रशासनाची मदत होती. मात्र काही काळानी प्रशासनाची मदत दूर झाली आणि महिलांना धमक्या मिळू लागल्या. या त्रासाला कंटाळून मी गाव सोडले. मात्र काम करण्याची इच्छा अजून आहे. - भावना नव्हाते, पांढरकवडा

अजूनही जिद्द कायमजरूरमध्ये दारूबंदीसाठी आम्ही महिलांनी मिळून काम केले. गावामध्ये दोन ते तीन वर्ष दारूबंदी कायम होती. महिलांवर खोटे आरोप लागले, गुन्हे दाखल झाले. यामुळे महिला खचल्या. आज गावात दारू सुरू आहे. यातून गाव अस्वस्थ झाले आहे. पुढील काळात दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही महिला काम करणार आहोत. - ललिता राठोड, जरूर, ता.घाटंजी

प्रशासनाची मदत नाहीधनज माणिकवाडामध्ये दारूबंदी करण्यात आली. या कामात सर्वांचेच सहकार्य मिळाले. मी आजारी पडलो आणि पुन्हा दारू सुरू झाली. खरं सांगायचे म्हणजे, पोलीस प्रशासनाची आम्हाला मदत मिळत नाही. यामुळे गावात दारू विकल्या जाते. दारूबंदीसाठी गावकरी तयार आहे, पोलीस यंत्रणा सोबत येईल का ? - अमित दाभेरे, तंटामुक्ती अध्यक्ष, धनज माणिकवाडा

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस