शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

यवतमाळात खासगी टँकरवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:36 IST

शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे.

ठळक मुद्देएसडीओंचे आदेश : सार्वजनिक व वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी घेण्यास निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे. या संदर्भातील आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत तीन महिन्यांपासून यवतमाळकर पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. नळाचे पाणी तीन आठवड्यानंतरच मिळत असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. अनेकांकडे तीन आठवडे पाणी साठवून ठेवण्याची कुठलीच सोय नाही. या परिस्थितीचा फायदा घेत यवतमाळात पाण्याचा चक्क व्यापार सुरू झाला. सुरुवातीला ४०० रुपयात मिळणारे पाण्याचे टँकर ८०० रुपयांपर्यंत जावून पोहोचले आहे. शहरात नगरपरिषद आणि राजकीय पक्षांच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा होत आहे. मात्र हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने खासगी टँकरधारकांचे चांगभले होत आहे. पाण्याचा हा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने आता कडक पाऊले उचलली आहे.पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर यापूर्वीच टंचाईक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सुरुवातीला बोअरवेल खोदण्यावर आणि बांधकामांवर बंदी आणण्यात आली. परंतु खासगी टँकरधारक पाण्याचा वारेमाप उपसा करून पाणी विकत असल्याने जलस्त्रोत तळाला जात आहे. भूजल पातळीही वेगाने खाली जात आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी टँकरला शहरातून पाणी उपसा करण्यास बंदी आणली आहे. या आदेशानुसार, खासगी टँकरधारकांना सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपसण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ च्या नियम ५२ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.यवतमाळ शहरात नगरपरिषदेच्या मोफत टँकरसोबतच राजकीय पक्षांच्या टँकरद्वारेही मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. आता खासगी टँकरला पाणी उपशास बंदी घातल्याने मोफत पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नगरपरिषदेत नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी टँकरचा नंबर देऊन कोणत्या भागात पाणीपुरवठा केला जातो, हेही सांगावे लागणार आहे. खासगी टँकरवर नियंत्रण आणण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. आता टँकरधारकांना पाणी आणण्यासाठी नगरपरिषद हद्दी बाहेरील जलस्त्रोंतांचा शोध घ्यावा लागणार आहे.पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाची उपाययोजनावॉशिंग सेंटरवरही बंदीयवतमाळ शहरात खासगी टँकरला पाणी उपशास बंदी घालण्यापाठोपाठ शहरातील सर्व वाहनांच्या वॉशिंग सेंटरवरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.पाण्याचा काटकसरीने वापर कराभीषण पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. घरातील नळांची गळती होऊ देऊ नये, खासगी बांधकामे पूर्णपणे बंद करावी, बाथरूममधील किंवा स्वयंपाकघरातील पाण्याला वाट करून देवून ते पाणी जमिनीत मुरविल्यास पाण्याचा स्तर वाढविण्यास मदत होईल. अंघोळ करताना शॉवरऐवजी बकेटमध्ये पाणी घेवून वापरावे. अतिरिक्त पाण्याचा वापर अंगणात किंवा बाहेर शिंपडण्यासाठी करू नये, पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई