शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

विदर्भात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 3:48 PM

पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे.

ठळक मुद्देनागपूरवरून डाफलर रडार सुटणार४०० किलोमीटर अंतरापर्यंत कार्यक्षेत्र निर्धारित

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्याकरिता नागपूर विमानतळावरून डाफलर रडार सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. या रडारवरून ४०० किलोमीटर कार्यक्षेत्रात अचूक मारा करून कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे.गेल्यावर्षीपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. यंदा तर पावसाने दडी मारल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ११ इंचापर्यंत खाली मुरला आहे. यानंतरही जलप्रकल्प तळाला गेले आहे. विदर्भाकडेही मान्सूनने पाठ फिरविली आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या. जलाशयातील पाणी पातळीही खाली गेली आहे. विदर्भात कुठेच मान्सूनचा जोर नाही. मान्सून सक्रिय नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची कबुली हवामन विभागाच्या संचालकांनी दिली आहे.पावसाने दडी मारल्याने विदर्भात पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. त्या दृष्टीने कृत्रिम पावसासाठी डाफलर रडार नागपूर विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून ४०० किलोमीटर परिघात पाण्याच्या उपलब्धतेचा ढग दिसताच कॅल्शीयम क्लोराईडची फवारणी करून पाऊस पाडला जाणार आहे. यामुळे विदर्भातील दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मदत होणार आहे. पिकांनाही त्याचा लाभ कृषी क्षेत्रालाही मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पावसाअभावी पेरणी न झालेल्या क्षेत्रात कृत्रिम पाऊस बरसल्यानंतर अथवा दुबार पेरणी करावयाची असल्यास तूर किंवा मका या पिकांचीच लागवड करावी लागणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने या दोन्ही बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.नागपूर, सोलापूर आणि औरंगाबादकृत्रिम पावसासाठी नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या तीन केंद्रांवर डाफलर रडार सज्ज ठेवण्यात आले आहे. तेथून पाऊस नसणाऱ्या भागात पाऊस पाडता येणार आहे. तत्पूर्वी आयएमडीच्या अधिकाऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी चर्चा केली आहे.विदर्भात मान्सून सक्रिय नाही. तूर्तास पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत कुठल्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा, याबाबतचा निर्णय शासनाचा असेल. शासनाच्या सूचनेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल.- ए.के.श्रीवास्तवसंचालक, हवामान विभाग प्रमुख, पुणे

टॅग्स :Rainपाऊस