जिल्हा निर्मितीसाठी अन्नत्याग सत्याग्रह
By Admin | Updated: October 3, 2015 02:23 IST2015-10-03T02:23:30+5:302015-10-03T02:23:30+5:30
पुसद जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाने आता जोर धरला असून कोणत्याही परिस्थितीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे ...

जिल्हा निर्मितीसाठी अन्नत्याग सत्याग्रह
पुसद विकास मंच : सत्याग्रह मंडपाला अनेकांची भेट
पुसद : पुसद जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाने आता जोर धरला असून कोणत्याही परिस्थितीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे यासाठी पुसद विकास मंचने विडा उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू करण्यात आले आहे. या सत्याग्रह मंडपाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
येथील टिळकस्मारक मंदिराच्या प्रांगणात अन्नत्याग आंदोलन शुक्रवार २ आॅक्टोबरपासून सुरू झाले आहे. ८ आॅक्टोबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. गत दोन दशकांपासून पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडला आहे. पुसद विकास मंचच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान, ठिय्या आंदोलन, संघर्ष रॅली आदी काढण्यात आली. हे आंदोलन अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने अॅड. सचिन नाईक, अभय गडम, साकीब शाह, अभिलेश खैरमोडे हे गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला बसले आहे. पुसद परिसराच्या विकासासाठी पुसद जिल्हा होण्याशिवाय कोणताही उपाय नाही. त्यामुळे सर्व घटकांच्या दृष्टीने जिल्हा होणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सत्याग्रह मंडपाला माजी कुलगुरू डॉ.शेषराव सूर्यवंशी, डॉ. वजाहत मिर्झा, महेश खडसे, डॉ. ओमप्रकाश काकण, वसंतराव पाटील कान्हेकर, नायब तहसीलदार धबाले, नारायण पवार, उमाकांत चक्करवार, शिवाजी देशमुख, मनोहर बनसकर, प्रा. संध्या कदम, प्रा. महेंद्र पखाले, प्रा. सुधीर गोटे, वामनराव देशमुख, भारत वानखडे, नारायणराव क्षीरसागर, एजाज खान, स्वप्नील ढगे, अतुल नागरे, पंडित मानतुटे, सुधाकर चापके, नथ्थूराम राठोड आदींनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी निशांत बयास, धनंजय सोनी, नारायण पुलाते, पंकज पारधे, कैलास जगताप, मनोहर बनसकर, राहुल कांबळे, रवी ग्यानचंदाणी, किरण देशमुख, देवेंद्र खडसे, अॅड. चंद्रशेखर शिंदे, अॅड. कैलास राठोड, बाळासाहेब बरडे, श्रीकांत सरनाईक, अॅड. प्रशांत कागदेलवार, नाना बेले, संजय बजाज, अॅड. उमेश रेवणवार, डॉ. संजय भांगडे, संजय भंडारी यांच्यासह पुसद येथील अनेक नागरिक सहकार्य करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलनाला सर्वपक्षीयांचा पाठिंबा
पुसद जिल्हा निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पुसद येथील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पुसदकर जनतेनेही या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. पुसद जिल्हा निर्मिती हा आता अस्मितेचा प्रश्न झाला असून पुसद जिल्हा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.